पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/559

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

い? R लो० टिळकांचे केसरींतील लेख. प्रस्तुतच्या वादाचे प्रथमत:च दोन भाग आपोआप पडतात. पहिला असा कीं, ब्राह्मणेतरांस खरोखरच स्वराज्य नको कीं काय ? व दुसरा असा कीं, त्यांनाही जर स्वराज्य हवे तर ते इरकत तरी कोणत्या गोष्टीला घेतात ? पैकीं पहिल्या प्रश्नासंबंधानें आम्हांस हें नमूद करण्यास आनंद वाटतो कीं, मद्रासकडे काय किंवा इकडे काय, ब्राह्मणेतराकडून आजवर प्रकट झालेल्या विचारामध्यें मुळांत स्वराज्याच्या मागणीलाच पूर्ण विरोध असा थोडाच दिसून येतो, व त्याचे कारणही उघडच आहे. ब्राह्मणेतराच्यातर्फे म्हणून जे गृहस्थ आज वादास प्रवृत्त झाले आहेत ते स्वतः सुशिक्षितच असल्यामुळे हिंदुस्थानातील हल्लींची एकतत्री राज्यपद्धति त्याना झाली तरी मनापासून आवडणें शक्यच नाही. इंग्रज लोकांनीं दिलेल्या शिक्षणाचा गुणच स्वातत्रयप्रियता हा असल्यामुळे सुशिक्षित लोक ब्राह्मणेतर असल तरी त्यांनाही आपण आपल्याच देशात नादान व खुरटलेलें राहार्वे आणि आपला सवै कारभार परक्यांनी आपली संमति न घेता करावा ही गोष्ट कशी आवडणार ? ब्राह्मणवर्गाच्या मानीव सामाजिक जुलमापासून का होईना पण स्वतत्न होण्याच्या बुद्धींत जें स्वाभिमानाचे बीज आहे तें राजकीय विचाराच्या भूमीतही फलदूप झालेंच पाहिजे. आपणास मोठ्या हुद्दयाच्या जागा मिळाव्या व ब्रिटिश ब्युरोंक्रसीनें चालविलेल्या राज्यकारभारावर आपल्यातील लोकमताचे दडपण असावें अशी महत्त्वाकांक्षा ब्राह्मणेतर झाला म्हणून त्याच्या मनात उद्भवल्याखेरीज कशी राहणार ? ब्राह्मणवर्गाचा पाडाव व्हावा अशी ब्राह्मणेतराना इच्छा होणें स्वाभाविक आहे असें घेऊन चालले, तरी केवळ ब्राह्मणाना अपशकून करण्याकरिता आपल्या राजकीय महत्त्वाकाक्षेचे नाक कापून घेण्यासही ब्राह्मणेतर कबूल होतील इतका अधमपणा आमच्या ब्राह्मणेतर बंधूमध्ये वसत असेल, त्याच्या मनुष्यत्वाची इतकी हानि झाली असेल, असें मानण्यास आमचे मनच घेत नाहीं, अर्थात् ब्राह्मणवर्ग क्षणभर विचारातून अजिबात वगळला आणि केवळ ब्राह्मणेतर व ब्रिटिश ब्युरॉक्रसी यांच्या पुरतेंच पाहिले तर स्वराज्य हवें असेंच ब्राह्मणेतराना वाटलें पाहिजे, व तसे त्याना आज वाटत आहेही. हल्लींच्या मुख्य वादात ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर या विशिष्ट उपवादाचीं जीं जाळीं दुर्दैवानें पसरलीं आहेत, तीं या एकंदर प्रश्नाचा खोल विचार करणा-या वाचकानें बाजूस सारून या खया मुद्दत्याचा लक्ष्यवेध मार्मिकपणानें करण्यास त्यानें शिकलें पाहिजे. अशा रीतीनें पहिल्या प्रश्नाचे नास्तिपक्षीं उत्तर दिल्यास वादाचे क्षेत्र आपोआप बरेंच कमी होतें. आम्हास स्वराज्य हवें पण त्याची कोणतीही योजना निश्चित होतांना * ब्राह्मणेतराच्या हक्काचे योग्य संरक्षण झाले पाहिजे ' असा या वादांतील दुसरा मुद्दा आहे या मुद्दयासंबंधानें आम्ही एकदमच असे सागून मोकळे होतों कीं, ब्राह्मणेतराच्या हक्काचे संरक्षण करण्याची कोणतीही सूचना पुढे आल्यास ब्राह्मण लोक तिचा विचार नुसत्या सहानुभूतीनेंच नव्हे तर थोड्याबहुत दिलदारीनेंही करण्यास तयार आहेत. कै. ना गोखले यानी आपल्या