Jump to content

पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/403

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३८८
लो. टिळकांचे केसरीतील लेख.

पण तेवढ्यामुळे शैत्र किंवा वैष्णव एवढेच काय ते हिंदु आणि बाकीचे हिंदु- धर्मी नव्हत असें होत नाहीं. व्यापक दृष्टीने पाहिलें म्हणजे भक्ति ज्ञान, कर्म आणि योग या चारही पंथातील लोक किंवा उपास्य भेदानें पाहिलें तर शैव वैष्णव, गाणपत्य, भागवत, वगैरे लोक सर्व हिंदुधर्मीच होत, असे मानणे भाग आहे. आणि अशा दृष्टीने पाहिले म्हणजे हिंदुधर्म हा नुसता शैव, नुसता भागवत किंवा नुसता भक्तिभार्ग नव्हे, असे त्याचें लक्षण करणें अवश्य पडतें. ही कल्पना आजकालची आहे असें नाहीं. “ यं शैवाः समुपासते शिव इति ब्रह्मेति वेदातिनः हा किवा महिम्नातील " त्रयी साख्यं योगः पशुपतिमतं वैष्णव- मिति " हा श्लोक आणला असता आमच्या म्हणण्याची सत्यता कळून येईल. या प्रत्येक मताच्या मुळाशी हिंदुधर्म आहे हे खरे; पण त्याचबरोबर हिंदुधर्म हा एका मतापेक्षा अधिक व्यापक आहे हे लक्षांत ठेवले पाहिजे. हिंदु कॉलेजांतील 'नॅशनल साग' मध्ये हेंच तत्त्व ग्रथित केले आहे; व त्यांतील वैदिक ' या पदाची ओढाताण करून हिंदु कॉलेजात शिकवला जाणारा हिंदुधर्म वेदबाह्य आहे, असे दाखविण्याचा कित्येकानीं केलेला प्रयत्न अगदीं दास्यापद आहे. कोणास हिंदुधर्म हें नांव आवडत नसल्यास या सामान्य धर्मास पाहिजे तर 'वैदिक धर्म' किंवा 'भारतधर्म' म्हणा. परंतु त्यास कोणतेंही नांव दिलें तरी हिंदु धर्मात जे नानापंथ आहेत त्या प्रत्येक पंथाहून तो भिन्न व अधिक व्यापक आणि अतएव या सर्व पंथांना मूलभूत होऊन राहिलेला आहे. या व्यापक हिंदुधर्माचे किंवा भारत धर्माचे लक्षण वेदातांतील ब्रह्माचा लक्षणाप्रमाणे ' तो अमुक नाहीं तो तमुक नाहीं ' अशा प्रकारचें करावें लागतें. आणि वर निर्दिष्ट केलेल्या पद्या ( Song )- मध्ये अशाच रीतीनें हैं लक्षण सांगितले आहे. हें चूक आहे असे प्रतिपादन करणें म्हणजे हिंदुधर्माच्या व्यापक स्वरूपाबद्दल कूपमंडूकन्यायानें आपलें अज्ञान प्रदर्शित करणे होय. आचार्यांनी जर ही पद्धत स्वीकारली असती तर त्यांस बौद्ध व जैन धर्माचें कर्धीही खंडन करतां आले नसते; व त्यांच्या भाष्यांत आमच्या धर्माचे जे उदात्त स्वरूप नजरेस येतें तेंही आलें नसतें. शैव किंवा वैष्णव हिंदुधर्मी आहेत; पण हाच सिद्धान्त उलट करून हिंदुधर्म म्हणजे शैव धर्म किंवा वैष्णवधर्म असे म्हणणे म्हणजे न्यायशास्त्रांतील एका प्रसिद्ध हेत्वाभासाचा आश्रय करणें होय. हिंदु कॉलेजाकरितां रचलेल्या राष्ट्रीय गीतामध्ये जे हिंदु धर्माचें लक्षण दिलें आहे तें या तत्त्वावरच दिलेलें आहे; आणि त्यांत ' न वैदिकोहं' असा उल्लेख अस ल्यामुळे जर हैं लक्षण चुकीचे म्हणावयाचे तर 'त्रयी' (तीन वेद ) हा शब्द वरील महिम्नांतील श्लोकात आहे म्हणून त्यांतील विचारही वेदबाह्य मानावे लागतील. परंतु हिंदु कॉलेजावरील आक्षेपकांनी इतका खोल विचार का म्हणून करावा ? त्याची सर्व मदार विझांटवाई विदेशी आहे एवढ्यावरच अवलंबून आहे. आणि या त्यांच्या मतास जिकडून जोर मिळेल ती खटपट करण्यास ते तयार आहेत. बाईंवर विदेशीपणासंबंधानें जो आक्षेप आहे त्यासंबंधानें आमचें