श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले ) नगर वाचानालय सातारा .
यापुढे जाऊन पंजाबी लोकगीतातली तर म्हणते ,
कोठी हेड पसेरा, निक्कल सस्सीऽए घर मेरा
खायल्या बथेरा, हुण रैहंदा राँदा मेरा।
ती सासूलाच सांगते तूच आता बाहेर निघ, हे घर माझे आहे. आतापर्यंत तू खूप खाल्लेस आता शिल्लक राहिलेले सारे माझे आहे.
कदाचित पूर्वी संसाराचे हे हाल कष्टच त्या स्त्रियांचे जीवन व्यापून राहिले आणि त्याना प्रत्यक क्षणी माहेरची याद येत राहिली. माहेरवरून कधी कोणी नात्यातलं माणूस भेटायला आलं, की त्यांचं हृदय भरून यायचं. तेवढंच काही क्षण ऊन हळुवार बनायचं. कधी एखादीचा भाऊ सासरी बहीण कशी आहे पाहायला यायचा. जेवणखान झाल्यावर विश्रांतीच्या एखाद्या क्षणी बहीण निवांत गाठ पडायची आणि मग दोघेच असताना भाऊ बहिणीला विचारायचा, 'कशी आहेस? कसं चाललं आहे?' त्याच्या तेवढ्या प्रश्नावर बहिणीला भरून यायचं. तिनं त्याला दिलेलं लोकगीतातलं उत्तर मोठं मार्मिक आहे ती म्हणते,
काय सांगू भाऊराया! माझा सासुरवास कसा
मंगळसुत्रीचा फासा उरी रूते ठसाठसा
त्या दोन ओळीत ती खूप काही सांगून जाते. इथे तिचा नवरा तिला जाच करत असतो, ते ती ‘मंगळसूत्राचा फासा' ची उपमा देऊन सांगते.
स्त्रीच्या मनात प्रत्येक वेदनेच्या क्षणी माहेर जन्म घेत असते. माहेरचा परिसर, वातावरण, बालपण सगळं-सगळं तिला आठवत असतं.
मैत्रिणीला माहेरचं कौतुक फावल्या वेळात सांगताना ती मनातल्या मनात माहेरात फिरून येत असते.
काय सांगू बाई! माहेराची बढाई
मात्या-पित्यानं लावली - येशीपासून अंबराई
इथून दिसतं माहेरीचं हिरवं रान ।
केवढं केळीबन! उतरीतो बागवान!
माहेरची समृद्धी-संपत्ती, तालेवारपणा याचा अभिमान ऊरी दाटलेला असतो आणि तरीही तिचा सासुरवास मात्र सुटलेला नसतो. ती पुढं म्हणते,
उंच्या ओसरीला हंड्या लावल्या सवाई
भावाच्या बरोबरी मायबाईचे जांवाई
एकामागे एक येत्याल मागंपुढे