देह मनाला आतून लागणारं 'भिरूड', म्हणजे दुःख सांगता येत नाही. सुखाला सगळे वाटेकरी असतात; पण दुःख मात्र ज्याचं त्याला सोसावं लागतं.
अशा वेळी हे मनातलं दुःख जवळच्या मैत्रिणीजवळ उघड करता यायचं. त्या सुखदुःख वाटून घ्यायच्या. कारण बऱ्याच वेळा बरीच दुःख ही सारखी असतात. या मैत्रिणीच्या प्रेमाची ओवी दोघींच्यातला मन ओलावा प्रगट करते
तुझ्याशिवाय मला अजिबात करमत नाही. आपल्या दोघींचे इतके जीवाभावाचे संबंध पाहून कोणीतरी काही किल्मिष निर्माण करण्याचा प्रयत्न करेल; पण तू मात्र मनात काही आणू नको आणि पुढं ओवीत ती म्हणते.
एक लवंग दोघीत वाटून घेणारी एकजीव मैत्री दोघीत अनामिक नातेबंध निर्माण करते.
जात्यावरच्या ओव्यांमध्ये येणारे बरेचसे शब्द ग्राम्य बोलीतील आहेत; पण त्यातही एक गोडवा आहे. मैत्रिणीला ‘गडणी' हा शब्द कानाला गोड वाटणारा हवाहवासा वाटणारा आहे. सलगी दाखवणारा आहे.
मैत्रिणींच्या मधील निष्काम आणि जिव्हाळ्याच्या प्रेमाने नटलेल्या या ओव्या एक फार सुंदरलोकसंस्कृतीचा गाभारा ।। २८ ॥