Jump to content

पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/४०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : ४०३

पृष्ठ ३२८: अमेरिका व सुइजरलंड यांनीही लोकांचे राज्य स्थापन केले.
 अमेरिकेतील संयुक्त संस्थाने व युरोपातील स्वित्झरलंड यांनी लोकमतराज्यपद्धती सुरू केली हे सांगून लोकहितवादींना भावी राज्यपद्धतीविषयी काही सांगावयाचे आहे.

पृष्ठ ३२८: इंग्रजांचे काही जिल्ह्यांत दंगे झाले आहेत
 १८३८-१८४८ या काळांत झालेल्या चार्टिस्ट चळवळीस अनुलक्षून हे विधान केले आहे. व्हिक्टोरिया राणी अधिकारपदावर आली त्या वेळी देशात अशांतता होती. रिफॉर्म बिल मान्य झाल्यावर आपली दुरवस्था नाहीशी होईल अशी कामगारवर्गाची समजूत होती, पण ती व्यर्थ ठरली. अपुरी मजुरी, भरमसाट महागाई, वाढती बेकारी यामुळे गरीब वर्गाची स्थिती फार वाईट झाली. ती सुधारण्यासाठी १८३७ साली फिअर्गस, ओकोनॉर व विल्यम लोबेट यांनी चळवळ सुरू केली. त्यात मागण्यांची सनद (The People' Charter) तयार करण्यात आली. त्यामुळे ती चार्टिस्ट चळवळ म्हणून ओळखली गेली. या चळवळीमुळे १८३९ मध्ये बरेच दंगे झाले.

पृष्ठ ३४७: (१) नारदासारिखे गायनशास्त्री, (२) कपिलासारखे शास्त्रज्ञ.
 (१) प्रसिद्ध नारदमुनी- तंबोरी छेडीत ईश्वरगुणगान करीत सर्वत्र संचार करणारे- हे येथे अभिप्रेत आहेत.
 (२) कपिल-सांख्य हे सहा दर्शनांतील एक दर्शन (तत्त्वज्ञान) त्यांचे हे प्रवर्तक.

पृष्ठ ३०५: ज्योतिषशास्त्रावर व लीलावती वगैरे ग्रंथ
 भास्कराचार्य (इ. स. ११४४). प्रख्यात भारतीय ज्योतिषशास्त्रज्ञ. 'सिद्धान्तशिरोमणि' आणि 'करणकुतूहल' हे त्यांचे ज्योतिष- गणितविषयक ग्रंथ. सिद्धान्तशिरोमणि ग्रंथाचा पहिला खंड पाटीगणित किंवा लीलावती हा अंकगणित व महत्त्वमापन यावरचा स्वतंत्र ग्रंथ असून दुसरा खंड बीज-गणितावरचा आहे.

पृष्ठ ३४८: कलियुग निघाले आहे... हा ईश्वरसंकेत
 कलियुग हे चौथे युग. कलियुग कल्पना ब्राह्मणग्रंथातून आढळते. (तै. ब्रा.