पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



प्रकरण : ६

धर्मात् अर्थश्च कामश्च !



 जगांतल्या दण्डसत्तांनी आणि विशेषतः चीनच्या दण्डसत्तेने भारताच्या लोकसत्तेला जें आव्हान दिले आहे तें भारताला स्वीकारतां येईल काय, आणि एकंदरच जगातल्या दण्डसत्तांच्या वाढत्या सामर्थ्यापुढे लोकसत्ताक राष्ट्रांना टिकाव धरतां येणें शक्य आहे काय, याचा विचार आपण करीत आहों. या अभ्यासांत भारताची स्थिति अत्यंत निराशाजनक आहे असें आपल्या ध्यानांत आलें. म्हणून त्याची कारणमीमांसा आपण करूं लागलों. ती करीत असतांना मागल्या प्रकरणांत आपल्या नेत्यांनी राष्ट्राच्या उत्कर्षासाठी जें तत्त्वज्ञान स्वीकारले आहे तें अत्यंत भ्रान्त, विपरीत व घातकी असून त्यामुळेच सर्व क्षेत्रांत आपल्याला अपयश येत आहे असा विचार मांडला, प्रत्येक क्षेत्रांत आपण उत्तम योजना आखल्या आहेत. पण त्या योजना सिद्धीस नेण्यासाठी जीं ध्येयवादी, कार्यक्षम, कर्तव्यदक्ष, प्रतिभासंपन्न, दूरदृष्टीचीं, व्यक्तित्वसंपन्न अशी माणसें लागतात तींच येथे नाहींत. आणि तीं नाहींत हा केवळ योगायोग नाही. अशी कर्तबगार माणसे निर्माण होण्यास समाजांत ज्या प्रेरक शक्ति असाव्या लागतात त्याच काँग्रेसच्या तत्त्वज्ञानामुळे नष्ट झाल्या आहेत व होत आहेत. राष्ट्रनिष्ठा ही अर्वाचीन काळांतली एक महान् प्रेरक शक्ति आहे. त्या निष्ठेमुळे माणसें ध्येयवादाने भारून जातात, वेडी होतात आणि मग वाटेल त्या पराक्रमाच्या कोटी करतात. या निष्ठेचें स्वरूप काय आणि काँग्रेसच्या भ्रामक उदात्ततेमुळे, भ्रान्त सात्त्विकतेमुळे व हीन सत्तालोभामुळे तिचा भारतांतून कसा लोप होत चालला आहे हे मागल्या प्रकरणांत सांगितले. आज राष्ट्रनिष्ठेइतक्याच, नव्हे, तिच्यापेक्षा शतपटीने जास्त प्रभावी अशा दुसऱ्या एका प्रेरक शक्तीचा विचार करावयाचा आहे. ती शक्ति म्हणजे धर्म.
 धर्म या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. समाजसेवा हाच धर्म असें कोणी