पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ७ गीतारहस्याचे तात्पर्य ३५ " आहे. नुसती भक्ति या दृष्टीने पाहिले तर नामस्मरण करण्यातच सर्व वेळ घाल- विणे हाच भक्तीचा परम उत्कर्ष ठरतो. पण कर्मावाचून अशा तऱ्हेची भक्ति करण्याबद्दल गीतेमध्ये कोठेहि वचन नाही. हे जग काही आम्ही केलेले नाही. म्हणून यातील व्यवहारहि आमचे नसून ईश्वरनिर्मित आहेत असे म्हणावे लागते. हे व्यवहार काम्य बुद्धीने अभिमानाने किवा स्वार्थबुद्धीने केले म्हणजे बंधाला कारण होतात. पण उत्कट भगवद्भक्तीबरोबर जगातील सर्व कामे परमेश्वराचीच आहेत किंवा त्यातील काही विशिष्ट भाग करण्याकरिताच ईश्वराने मला जन्म दिला आहे या भावनेने म्हणजे आपण जे काही करतो ते परमेश्वरार्पण करून जगाचे सर्व व्यवहार चालविणे हे प्रत्येक मनुष्याचे काम आहे असा गीतेचा उपदेश आहे. किंबहुना विराटरूपी परमेश्वराची ही एक उपासनाच होते असे म्हटले तरी चालेल व याच हेतूने ' स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विंदति मानवः हा श्लोक गीतेच्या अखेर आला आहे. 'सर्व भूतांच्या हितामध्ये रत' होऊन स्वार्थाचा सर्वस्वी परार्थात लय करणे व अशा आत्मौपम्य बुद्धीने फलाशाविरहित जगातील कामे करणे हा भक्तियोग सर्व भक्तियोगामध्ये श्रेष्ठ होय व हाच गीतेत प्रतिपाद्य आहे. लोककल्याणाची किंवा परोपकाराची उपपत्ति इतक्या सुंदर रीतीने प्राश्चिमात्य पंडित म्हणतात त्याप्रमाणे नुसत्या आधिभौतिक मार्गाने कधीहि लागत नाही. म्हणून गीतेतील कर्मयोग पाश्चिमात्य कर्मयोगापेक्षा अधिक श्रेष्ठ व उदात्त आहे असे माझे मत आहे. अर्जुन अशा तऱ्हेने कर्म करण्यास तयार झाल्यावर ज्या- प्रमाणे भगवंताने त्याचे सारथ्य केले त्याप्रमाणे तुम्हीहि हा योग आचरण्यास लागल्यावर तुमचे भगवान साहाय्य करतील यात शंका नाही. ज्ञान आणि काम्य कर्म यांचा विरोध आहे खरा; पण ज्ञान व निष्काम कर्म यात कोणताहि विरोध नाही. म्हणून निष्काम कर्म हे ज्ञानप्राप्तीचे नुसते साधन न मानता ज्ञानोत्तरकर्म गीतेत विहित धरले आहे. सर्वाभूती समबुद्धि झाल्याने कुलाभिमान, देशाभिमान वगैरे सद्गुण नाहीसे होतात असा कित्येकांचा आक्षेप आहे. पण तोहि माझ्या मते खरा नाही. गाय व ब्राह्मण यांच्या ठिकाणी समबुद्धि झाल्यावर गाईच्या पुढला चारा ब्राह्मणास व ब्राह्मणाचे अन्न गाईस ज्याप्रमाणे कोणी घालीत नाहीत, तद्वतच सर्वभूतात्मैक्यबुद्धि व देशामिमान यांची गोष्ट आहे. स्पेन्सर वगैरे आधु- निक आणि भौतिक पंडितहि सर्वभूतात्मैक्यबुद्धि हेच इहलोकीचे परम श्रेय मानतात. पण ही बुद्धि कायम ठेवूनहि प्रसंगविशेषी सारासार विचारांती देशा- भिमानच पतकरावा लागतो, असे जे त्यानी प्रतिपादन केले आहे त्यास कोणी हरकत घेत नाही. मग वेदांतासच ती हरकत लागू का करावयाची ? वेदांत तुम्ही देशाभिमानाने वागता किंवा कुलाभिमानाने वागता हे पाहत नाही. सारासार विचारांती ज्या प्रसंगी शास्त्रतः जे योग्य दिसेल ते तुम्ही करा, त्यास वेदांत नको म्हणत नाही. पण या सर्वांचे मूळ सर्वभूतात्मैक्यबुद्धि असल्यामुळे ती बुद्धि प्रथम संपादन करा आणि मग व्यवहारात जी कर्मे प्राप्त होतील त्यांचा समबुद्धीने