पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३४ लो० टिळकांचे चरित्र भाग ७ अनुक्रमे वैष्णव व शैव असा करितात. पण हे अर्थ खरं नव्हत. भागवत भगवं- ताची उपासना करणारे असतात हे खरे, पण शिवाची उपासना भगवंतास अमान्य नाही हे ' येप्यन्यदेवताभक्ता' या गीतेतील श्लोकावरून उघड होते. तसेच स्मार्त म्हणजे केवळ शिवोपासकच असतात असेहि नाही. कारण आमच्याकडील स्मार्ता- मध्ये पंचायतनाची पूजा चालू असून स्मार्त मार्गाचे प्रवर्तक जे आद्यश्रीशंकरा- चार्य त्यांच्या मठातील उपास्य दैवतहि शिव नसून शारदा आहे. यावरून स्मृत्युक्त आश्रमव्यवस्थेप्रमाणे चालून अखेर कर्मत्यागरूपी संन्यासाश्रम घेणे हे मनुष्याचे कर्तव्य होय असे मानणारे लोक स्मार्त आणि अखेर कर्मत्यागरूप संन्यास घेण्याची जरूर नसून ते काम फलाशासंन्यासानेहि तितकेच सिद्ध होते असे जे भगवंताचे मत ते जे ग्राह्य मानतात ते भागवत - असे या दोन शब्दांचे मूळ अर्थ असावे हे उघड होते. पहिल्या ग्रंथास स्मार्त किंवा सांख्यभागी हे नाव आहे आणि दुसऱ्या पंथास भागवतधर्म किंवा कर्मयोग असे म्हणतात. वस्तुतः पाहिले तर गीता भागवत मार्गाची आहे स्मार्त मार्गाची नव्हे. तथापि या दोन मार्गाबद्दल तंटा करीत बसण्यात इंशील नाही. कर्माचा संन्यास केला काय आणि फलाशेचा संन्यास केला काय सन्यासाचे म्हणजे निवृत्तीचे तत्त्व दोनही ठिकाणी एकसारखेच कायम राहते - एकं सांख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति - अशी समबुद्धीने या दोन मार्गांची एकवाक्यता गीतेत केली आहे. भागवतपुराण हा भागवत धर्मा- वरील हल्ली मुख्य ग्रंथ समजतात पण ऐतिहासिक दृष्ट्या तो भारतानंतरचा आहे हे स्यातील पहिल्या अध्यायाच्या कथेवरूनच उघड होते. म्हणून मूळचा भागवत धर्म गीतेचाच होय. त्यात केवळ भक्तीला प्राधान्य दिलेले नसून भक्तीने अंत:- करणशुद्ध झाल्यावर निष्काम कर्म केलेच पाहिजे - मामनुस्मर युद्धय च- असा दुहेरी उपदेश आहे. भागवतात निष्काम कर्माचे हे प्राधान्य न राहता भक्तीला प्राधान्य आले असा फरक झाला आहे. भागवत धर्माचे हे दुसरे स्वरूप होय. यात अद्वैतवेदांत कायम होता. पण तोहि पुढे काढून टाकून गीतेत अद्वैताऐवजी विशिष्टाद्वैताचा भक्तीशी मेळ घातला आहे असे रामानुजानी ठरविले आहे आणि अद्वैत किंवा विशिष्टाद्वैतहि गीतेत प्रतिपाद्य नसून द्वैतवेदांतच गीतेत प्रतिपाद्य आहे असे मध्वाचार्यांचे म्हणणे आहे. पण आमच्या मते हे सांप्रदाय एकदेशी असून अद्वैतज्ञानमूलक भक्तिप्रधान निष्कामकर्मयोगच गीतेतील मुख्य प्रतिपाद्य विषय होय. केवळ ज्ञान व संन्यास अगर केवळ भक्ति गीतेत प्रतिपाद्य नाही. उपसंहार सारांश गीतेतील उपदेश परलोक आणि इहलोक या दोहोतील कार्य साध- ण्यासाठी सांगितलेला आहे नुसत्या परलोकासाठी नव्हे हे सर्वांनी लक्षात ठेवण्या- सारखे आहे. कर्मसंन्यासाने मोक्ष मिळत नाही असे नाही. परंतु लोकसंग्रहासाठी शास्त्रतः प्राप्त होणारे आपले कर्तव्य तुम्ही केलेच पाहिजे असे गीतेचे सांगणे