पान:लागीर.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

'काय बाई तरी दुनिया ! जिथं जावं तिथं काळयाच कर्माला आग लागलीया. गाऱ्हाणं तरी न्यावं कुणाकडं? शिया ‘वरच्या देवाकडं न्यावं. तवर गरीबानं सारं ऐकायचं, वगायचं, वा ऽऽस्स ! , 'मग तुमी हिथं वस्तीवर दुखणं रे ( 7 मग कसं तर? दवा-पाणी, सेवा-चाकरी करायला कुणी ( लागीर ८० समदा परस्वाध्यान मामला. रेटणार व्हय? नाय, राधाक्का पुन्ना आली हुतीं का? ( 'व्हय, उभयता येऊन गेली. गाडी जुपून पावणा आला हुता. बागायती वाढवलीया. त्येच्या माग ढीगभर कामं आली नि गेली, पाखरावाणी. तुझं लालासाब कसं हायती? 'बेस हायती की. ' ‘संग का आलं न्हाइत? | काढण्या लागल्यावाणी हाय. कसं निभायचं? ( • मस्त विच्छा हुती त्यची, पर मालदत नाय. व्हय, त्येबी खरंच. अजून तुमचा संसार मार्गी लागायचा हाय.' हां, तेवढी दोन वावरं सोडली की की घोर मिटल. ७. तवर जीवाला TR 'सुटत्याली वावरं. समदं चांगलं हुईल. उगं जीव कुरतडू नका. लई वढावढी जीवाला बरी नसती. ' व्हय, जमलं तसंच चाल्लंय.' 'बेस, हाय तेच.' तेवढ्यात जाधवाच्या शेतातलं रोजगारी गडी आलं. राजाक्काला बघून त्यांना समाधान वाटलं. म्हातारबाबाच्या दुखण्याचं त्यांनी राज- क्काला कळवळा येऊन सांगितलं. रोजगाऱ्यांनी दशम्या सोडल्या. तात्यारावनं म्हाताऱ्यासाठी भात आणला होता. तो म्हातारबाबापुढं ठेवला. राजाक्कानं बाबांना बसतं केलं. चूळ भरुन त्यांनी दोन घास भात घशाखाली घातला नि 'पुरं' म्हणून हात आखडला. राहिलेला भात राजाक्कानं खाऊन भुकेला गप्प केलं. काल सकाळी ती जेवली