दुसरा मार्ग नसल्यामुळे, नोटा काढणं आवश्यक झाले व पूर्वीच्या
कायद्यांचे उल्लंघन केल्याशिवाय या नवीन नोटा काढतां येत नस-
ल्यामुळे त्या कायद्यांमध्ये दुरुस्ती करून, रुपयांचा आधार नस-
तांही नोटा काढण्याची परवानगी सरकारने घेतली.त्यामुळे
चलनांत १२५ कोटि नोटा अधिक आल्या.त्यामुळे एकंदर
चलन इतके वाढले आहे की, त्याचा परिणाम किंमतीवर झाल्या-
शिवाय राहिला नाहीं. हल्लींच्या मित्तीस एकंदर चलनांत अद-
मासे २५० कोटि रुपये व १७५ कोटींच्या नोटा आहेत हे पूर्वी
सांगितलेच आहे. अशा रीतीनें एकंदर चलन ४००।४२५
कोटींचें झाल्याने व व्यापारधंदा, उद्योग व आर्थिक उत्पादन स्थिर
असल्यानें, रुपये जास्त व वस्तु कमी असे होऊन, त्यांचे गुणो-
त्तर बदलले आहे.
यास उपाय एकच आहे. तो हा की, सिक्यूरिटींच्या आधा-
रावर नोटा काढण्याचा कायदा रद्द करून, पूर्वीप्रमाणे रुपयांच्या
आधारावर नोटा काढण्याची पद्धति पुनः अमलांत आणिली
पाहिजे. महायुद्धाचे पूर्वी २० कोटि रुपयांच्या नोटा सिक्यू-
रिटींच्या आधारावर काढितां येत असत. ही मर्यादा फार तर
३० कोटींवर न्यावी; परंतु यापेक्षा अधिक नोटा काढणे झाल्यास
रुपये अथवा सॉव्हरिन नोटांच्या निधीमध्यें ठेविल्याशिवाय चालणार
नाही असा कायद्याचा निर्बंध पाहिजे. असे केल्याने नोटांची वाढ
अमर्याद होणार नाहीं व किंमतीवर अनिष्ट परिणाम होणार नाहीत.
पान:रुपया.pdf/230
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२२७)