स्थान सरकारच्या फडणिसांनी आपल्या मुखानें कबूल केले आहे
ह्रीं त्यांतल्यात्यांत आनंदाची गोष्ट आहे.
हुंडणावळीचा भाव जरी अशा तऱ्हेनें वाढत गेला, तरीसुद्धां
हुंड्या विकण्याचें अगदी बंद झाले नव्हते. १९१४ चे आगष्ट-
पासून १९१५ चे जानेवारीपर्यंत, १९९५चे जूनपासून सप्टेंबर-
पर्यंत, १९१८ च्या अखेरीस १९२० च्या जानेवारीपासून त्या
सालच्या अखेरपर्यंत उलट हुंडया विकण्याचा प्रसंग आला. या:
शिवाय इतर सर्व महिन्यांत हुंड्या विकल्या जात होत्या. यांचे
प्रमाण कधीं जास्त व कधी कमी असे. १९१६-१७ मध्ये जवळ
जवळ ५४ कोटि रुपयांच्या हुंड्या विकल्या. १९१९/२० मध्ये
४७ कोटि रुपयांच्या हुंड्या विकल्या.
महाबुद्धाच्या कालांत जवळ जवळ १२० कोटि नवीन रुपये
टांकसाळीतून पाडल्यामुळे सुवर्णचलन निधि जवळ जवळ २५
कोटींनी वाढला. पूर्वीप्रमाणे रुप्याचा भाव असता तर एका रूप-
यामागे ५ आणे प्रगणे एकंदर फायदा अदमासे ४० कोटि रुपये
झाला असता. परंतु यांपैकी बरेचसे रुपये चांदी महाग असतांना
पाडले होते व त्यांत नफा न होतां उलट किंचित् नुकसानच झाले.
१९९६ मध्ये ४० कोटि; १९१७ मध्ये ४७ कोटि; १९१८ मध्ये
५२ कोटि याप्रमाणे या निधीची वृद्धि झाली आहे.महायुद्धा-
तील टंचाईमुळे या निधीमध्ये रोख सोनें मुळींच नसून, सर्व
सिक्युरिटीच आहेत.
पान:रुपया.pdf/220
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२१७)