हे पान प्रमाणित केलेले आहे.
आहे. परंतु हे सांस्कृतिक दिवस त्यांचे महत्त्व मात्र भारतीयांच्या भावजीवनात अजूनही ताजे आहे. नारळी पौर्णिमेला नारळीभात कोकणात होणारच. आणि देशावरचे रक्षाबंधन बासुंदी श्रीखंडाने मधुर होणारच. महाराष्ट्र उत्तर दक्षिण भारताच्या मध्यावर आहे. कोल्हापून पासून गोवा जवळ. तर जळगाव धुळ्यापासून गुजराथ जवळ. उदगीर निलंग्यापासून कर्नाटक हातावर. हिंगोली नांदेडपासून तेलंगण, आंध्र जवळ. याचा परिणाम असा की महाराष्ट्रातील लोकसंस्कृतीवर या सर्व प्रांतातील विविध रितीपरंपरांच्या इन्द्रधनुषी छटा विविध विधी, उत्सव सणांमधून सतत जाणवतात. त्यांचा अभ्यास हा सुंदर ध्यास असतो.
□
७८ / रुणझुणत्या पाखरा