पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/१६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 (कुसुमावती आणि अनिल दोघांची या वर्षी जन्मशताब्दी आहे.)
 ... आपणही निरामय, वैश्विक प्रीती, भावनेची प्रतिष्ठा अबाधित ठेवूनच विरोध करावा आणि प्यार व्यार करनेवालोने भी पाश्चात्त्यांचे अंधानुकरण विकृत पद्धतीने कशाला करायचे? आपल्याकडे काय कमी प्रेमगीतं आहेत प्रियाला पाठवायला? आणि निरामय प्रेमात (प्लेहॉनिक... अशारीरिक नव्हे हं ) हाती आलेले काटेही फुलासारखेच जपायचे असतात. 'प्यासा' काय म्हणतो?

हमने तो जब कलियाँ मांगी
काटों का हार मिला
जाने वो कैसे लोग थे
जिनके प्यार को प्यार मिला...

 राधेचे प्रेम कधीच 'म्हातारे' होत नाही. ते ताजेच राहते. तनामनाने एकरूप होण्याची क्षणैक तृप्तीही नेहमीच चिरतरुण असते. म्हणूनच कवी म्हणतो-

तू ऐल राधा, तू पैल संध्या
जीवनाच्या संध्यासमयीही तू,
चैतन्यमयी ऊर्जा देणाऱ्या
बहराच्या बाहूंची... असतेस.


रुणझुणत्या पाखरा / १४९