र० ते तरी काय करतील? घरी खायला नाहीं
ह्याची काळजी करावी की नोकरी पहात फिरावं ?
तरी कधी घरी बसत नाहीत. ते जेव्हां तव्हां
ह्मगतात, प्रयत्न करत परंतु नशीब उदयाला
येत नाहीं; त्याला मी काय करूं? " बरं, गूण थोडे
का आहेत अंगांत सगळे लोक चांगले ह्मण-
तात, पण नशीबाला काय करावं?त्यांतून प्र
यत्न करतातच. हे दिवस वाईट आहेत, उद्यां
निवून जातील.
स० - अग, त्यांचे दिवस जर वाईट आहेत तर आपण
आपलं नुकसान कां करून घ्यायचं असंच
नाही लावून गोडीनंच सांगावं की माझं कां नुक-
सान करितां ? हे दिवस निवून गेल्यावर मला
कोणी पैसा देईल कां ? तुमच्याजवळूनही नाहीं.
आगखी बाहेरूनही मिळवू देत नाहीं, तर हे
कांही चांगले नाही. इतकं करून जर न ऐकतील
तर साफ सांगावं स्नेह तुटला ह्मणून काय हरकत
आहे ? पैसा असला तर साच्या गोष्टी, नाही तर
कोण विचारतो !!
र० - आई, काय हे भलतंच सांगतेस ! असं एकाएकी
कसं बोलवेल ? मी त्यांना वचन दिलं आहे.
तेव्हां है कांही मला बरं दिसत नाहीं.
स० - त्याला काय झालं ! अर्शी वचनं किती वेळां दे-
तात आणखी खोटी करतात. वचन ह्मणजे काय
पैसा असला तर, नाहीं तर कोण विचारतो! उद्यां
पान:रमानाटक.pdf/५०
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४६
रमानाटक