.३९
र० - - (दुःखार्ने ) आपल्यापुढे मी काय बोलूं ?
रु० - - तूं काळजी करूं नकोस फार दिवस तुला इथें
ठेवणार नाहीं. आतांच बरोबर नेली असती, परंतु
लोक नांवें ठेवतील व स्टेशनावर पोचवायला दादा
आले ह्मणजे पंचाईत होईल, याकरितां तूर्त नेत
नाहीं, तिकडे तरी जुळलें तर बरें, नाहीं तर मी
ताबडतोच परत येईन. मग येथेंच राहूं, जे होईल
तें होवो.
र० -- जसं तुमच्या मनास येईल तसं करा. परंतु मला
फार दिवस इथं ठेवू नका. मला किनई आतां तु-
मच्यावांचून एक घटकाभर सुद्धां चैन पडत नाहीं.
तुझी नोकरीवर जातां आणि दोनप्रहरीं घरीं लौ-
कर जर आला नाहीत तर मी खिडकींत वाट प
हात बसत असतें आणखी जिवाला हुरहुर वाटते.
कृ० -- असो. अर्धी नोकरीवरून रजा मिळाली पा-
हिजे. तर मी जातों. आतां (घड्याळ पाहून) दोन
वाजून गेल्या. आज फार काम आहे.
र० -- जाल आतां. बसानात थोडा वेळ.
ना० – नको. उगीच धनी रागें भरेल. त्यांत काय
अर्थ आहे !
र० -- संध्याकाळीं लौकर घरी या.
ना० --बरें आहे. ( असे बोलून परस्परांचें चुंबन
घेऊन जातात. )