पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गिळण्याची क्रिया, अन्न पोटाकडे सरकण्याची क्रिया. दुसरा प्रकार आहे घुसळण्याची / गिरक्या घेण्याची गती. याचे उदाहरण आहे जठरातील अन्नाचे पचन करण्यासाठी पचन संस्थेला मिळणारी घुसळण्याची गती. तीसरी गती आहे स्नायुपेशीचे सततचे, अखंडितपणे पुनःपुन्हा विस्फारणे, स्फूरण पावणे. या गतीवर आपले अजिबात नियंत्रण नसते. आपले मन व बुद्धी टीव्हीवर अंत्य विधीचे दृष्य पाहण्यात गढून गेलेले असते. जठराच्या पचन क्रियेकडे तसेच जठराच्या गतीकडे त्यांचे दुर्लक्ष होते. त्यामुळे जठराची स्वाभाविक गती सुरू होते. गतीचा वेग वाढतो. अन्नाचे पचन सुरू होण्यापूर्वीच ते जठरातून पुढे छोट्या आतड्यात ढकलले जाते. छोटे आतडे एखाद्या लांबलचक नळीसारखे आहे. पण ते ताणून सरळ केले आणि मोजले तर साधारणपणे ७० ते ७२ चौरस फूट भरते. हा फार मोठा आकार झाला. तुम्ही बसलेल्या खोलीची लांबी-रुंदी लक्षात घ्या म्हणजे हा आकार किती मोठा आहे हे लक्षात येईल. छोटया आतड्याच्या आतील भागावर बोटांसारखे तंतू असतात. ते पोषक अन्नघटक शोषून घेतात व इतर अवयवांकडे पाठवितात. पण स्नायूंची गती वाढलेली असल्यामुळे या तंतूंना अन्नरस शोषून घेण्यास अवधी मिळत नाही. त्या अगोदरच हा अर्धवट पचन झालेला अन्नरस पुढे मोठ्या आतड्यात ढकलला जातो. आपल्याला पोट साफ करण्याची अनिवार इच्छा होते. अन्नातील पोषक द्राव शौच्यावाटे जोराने बाहेर फेकले जातात. शरीरातील हा जलाधार बाहेर पडल्यामुळे स्नायूंची शक्ती क्षीण होते. सर्वच अवयव गर्भगळित होतात. झाडे वनस्पती पाण्यावर वाढतात. पाण्यामुळे जगतात. त्यातील पाणी संपले म्हणजे झाडाचे लाकूड होते. तसेच आपले आहे. हे जलतत्त्व आपल्याला शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम बनवते. यामुळेच चयापचन होऊन आपल्या शरीरातील पेशी नव्याने निर्माण होत असतात. साधारणपणे शंभर दिवसांमध्ये शरीरातील सर्व रक्तपेशी नव्याने तयार झालेल्या असतात. मेरुदंडावर असलेले हे पाच ऊर्जाचक्र सूर्यनमस्काराचा नैसर्गिक आधार आहेत. मुलाधार चक्राचा क्रमांक पहिला. याचा वापर सूर्यनमस्कारात करायचा नाही. सातवे चक्र सहस्राधार चक्र. त्याचे केंद्र शरीराच्या बाहेर आहे. ते जिथे आहे मेदवृद्धीतून मुक्ती ४५