पान:मेणबत्त्या.pdf/161

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३३

झाल्याने व मागून पंपाचा दाब मिळाल्याने त्या मिश्रणांतील पाणी व स्निग्ध पदार्थ निराळे न होतां एकत्र रहातात. व भट्टीतील उष्णतेमुळे त्या मिश्रणास ६१२° फा. अंशाची उष्णता पोचते. याप्रमाणे ६१२० फा. अंश गरमीवर ते मिश्रण दहा मिनिटे राहिले झणजे त्याच्या घटकांचे पृथःकरण होते. नंतर त्या दरेक घटकाच्या स्वतंत्र अस्तित्वास लागेल इतके पाणी शोषून घेऊन यांत्रिक संयोगाने मिश्र अशा स्थिती. त त्या घटकांचे मिश्रण, थंड पाण्याच्या हौदांतील नळीत येते. ते मिश्रण पुनः वर खालीं चढून त्याच्या बाहेरील कॉकजवळ आले म्हणजे त्यांतील उष्णता पुष्कळ कमी झालेली असते. अती उष्ण मिश्रण जर ऐकदम बाहेर काढले तर त्यावरील दाब कमी झाल्याने तो नळ फुटेण्याचा संभव असतो. सबब तें अती गरम मिश्रेण प्रथम थंड करून नंतर बाहेर काढावे लागते. याच हेतूनें त्या हौदांत थंड पाणी भरून त्यांत तो नळ ठेवावा लागतो. याप्रमाणे बरेंच थंड झालेले मिश्रण कॉकवाटे दुसऱ्या लोखंडी हौदांत सोडावे. यांत मूळ स्निग्ध पदार्थातील घटक जे ग्लिसराईन व स्निग्ध आसिडें तीं यांत्रिक संयोगानें मिश्र असतात. म्हणून ते तेथे काही वेळ स्थिर ठेवावे. नंतर ग्लिसराईन काढून घ्यावें व बाकी जी मिश्र ( पातळ व घट्ट ) स्निग्ध आसिडें रहातात त्यांजवर मागे सांगितल्याप्रमाणे थंडा व गरम दाब करून मेणबत्त्यांचे घट्ट द्रव्य जे स्टिअरीक आसीड तें निराळे काढून ठेवावे. या प्रकाराने काम करण्यांत स्निग्ध पदार्थाचे प्रमाण दर वेळेस अल्प घ्यावे लागते म्हणून स्टिभरीक आसीडही दर वेळेस थोडेंच तयार होते.
 फायदे....१ ग्लिसराईन व स्निग्ध आसिडें अधिक स्वच्छ तयार होतात. २ खर्च ३ वेळ कमी लागतो व ४ यांत्रिक सामग्री थोडी लागते.