पान:मृच्छकटिक.pdf/17

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १६ )


मोठा चमत्कारिक प्रसंग होता त्या मानधन व प्रामाणिक पुरुषावर !

 चारुदत्ताच्या पत्नीला हे समजलेंं. अर्थात तिला वाईट तर वाटलेंंच पण आपल्या पतीची अब्रू वाचविण्याची हीच वेळ आहे हेंहि तिनेंं लक्षात घेतलेंं. आपल्या अंगावरच्या मौल्यवान रत्नहाराची तिला आठवण झाली. पण मानी पति ह्या मदतीचा स्वीकार सरळपणे करणार नाहींं, ही तिची खात्री होती. म्हणून तिने कांहीं व्रताच्या सांगतेची दक्षिणा म्हणन तो रत्नहार मैत्रेय ब्राह्मणाच्या हातावर ठेवून त्यावर पाणी सोडले. चारुदत्त यांतील इंगीत न समजण्याइतका सामान्य बुद्धीचा नव्हता. तरीपण नाइला- जाने त्याने सांगितले की, 'मैत्रेया, द्युतांत दागिने हरलों म्हणून त्याच्या मोबदल्यांत ही रत्नमाला पाठविली आहे, असेंं वसन्तसेनेला सांग. रत्नमाला तिला देऊन ये.'

 मैत्रेय आपल्या उदार मित्राच्या सांगण्याप्रमाणे निघाला. त्याच्या मनांत नव्हते, पण दुसरा इलाजहि नव्हता. एवढ्याशा दागिन्यासाठींं त्याच्या कितीतरीपट किंमतीची रत्नमाला वसन्तसेनेने घ्यावी, हे त्याला पसंत नव्हतेंं. तरी- पण तो तिच्याकडे जावयाला निघाला. परंतु तो तिथे जाऊन पोहोचण्यापूर्वीच वसन्तसेनेचे दागिने तिच्या घराची वाट चालूंं लागले होतेंं.

**

 चारुदत्ताच्या घरून दागिन्यांचे डबोलें घेऊन पळालेला