या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
युध्दतहकूब सैन्याचे अतिशय नुकसान झाले व ते गोंधळून मागे हटू लागले. इतक्यांत हिंदी सैन्यास पुन्हां कुमक मिळाल्यामुळे ते जोराने लढू लागले. वेळ आणीबाणीची असल्यामुळे दोन्ही बाजूचे सैन्य निकराने लढत होते. हा घनघोर लढा कित्येक दिवस चालला होता. इतक्यांत तुर्की सरकाराने युद्धतहकुबी मागितली अशी बातमी कॉन्स्टॅटिनोपलहून रणांगणावर येऊन थडकली ! त्यामुळे तुर्क व दोस्तराष्ट्रे यामध्ये चाललेले युद्ध तहकूब झाले.