होता. सुमारे दोन वर्षे शहाजीराजे विजापुरास राहिले. नंतर त्यांस कर्नाटकांत पाळेगारांच्या बंदोबस्ताकरितां जावें लागल्यामुळे, जिजाबाई व शिवाजी यांस आपल्या जहागिरीवर पुण्यास पाठविलें. शहाजीराजे सन १६४० त परत विजापुरास आले. त्यावेळी हीं मातापुत्र पुन्हां विजापुरास गेली. तेथून ती परत सन १६४३ च्या सुमाराम आली.
मोंगलाबरोबर अदिलशहाचा सन १६३६ त तह झाला. त्यावेळी मावळप्रांत
अदिलशहाच्या ताब्यांत गेला. तेव्हां तेथील देशमुख देशपांडे, अदिलशहाचें
अंकित झाले. त्यांस त्यांच्या मुलखाच्या बंदोबस्ताकरितां अदिलशहाकडून नेम-
णूकाहि मिळाल्या, तत्रापि हे देशमुख देशपांडे आपल्या मुलखाची व्यवस्था स्वतं-
त्रपणेंच करूं लागले. ह्यावेळी चरित्रनायकाचे पदरीं कोंकणें व मावळे मिळून
पांचशे लोकांचे सैन्य होते. त्यांच्या खर्चाकरितां अदिलशहाकडून कांहीं मुलूखही
मिळाला होता. असे असतांहि चरित्रनायक स्वधर्म संरक्षणार्थ व स्वराज्य स्थाप-
ण्याकरितां शिवाजी महाराजांच्या राजकारणांत स्वयंस्फूर्तीने येऊन मिळाले.
त्याची हकीगत पुढील भागांत देण्यांत येईल.