पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/८४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



४४.
समारोप
 



 महाराष्ट्र संस्कृतीचे जे दर्शन येथवर आपल्याला घडले त्यावरून एक गोष्ट निश्चित दिसते की भारतातल्या इतर प्रांतांच्या संस्कृतीपेक्षा ही संस्कृती कोणत्याही दृष्टीने कमी नाही, असली तर काही क्षेत्रांत सरसच आहे.
 परकीयांचे आक्रमण मोडून काढणे याबाबतीत महाराष्ट्राने विशेष पराक्रम केला आहे. गौतमीपुत्र सातकर्णी या सातवाहन कुळातील राजाने शकांचे आक्रमण निर्दाळून त्यांना राजस्थान, सौराष्ट्र येथपर्यंत पिटाळून लावले व महाराष्ट्रभूमीत पुन्हा स्वातंत्र्याची स्थापना केली. चालुक्य राजा सत्याश्रय पुलकेशी याने हर्षवर्धनाचे आक्रमण मोडून काढले. शिवछत्रपतींच्या मराठ्यांनी अखिल भारतात संचार करून मुस्लिम आक्रमणाची पाळेमुळे खणून काढली आणि शेवटी ब्रिटिश सत्तेला सुरुंग लावण्याचे कार्य विष्णुशास्त्री चिपळूणकर व लोकमान्य टिळक या महाराष्ट्रीय पुरुषांनीच केले. परकीय आक्रमणाचा मोड करून स्वातंत्र्यरक्षणाचे कार्य तसे चंद्रगुप्त मौर्यापासून अनेक प्रांतांतील वीरपुरुषांनी केले आहे. पण या कार्याची एवढी दीर्घ परंपरा महाराष्ट्राखेरीज अन्य प्रांतांत क्वचितच दिसते.
 महाराष्ट्र संस्कृतीच्या इतिहासाचे, सातवाहन ते यादवकाल, बहामनीकाल, मराठा