पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/८१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७८७
विचारप्रधान साहित्य
 

 मराठीतील विचारप्रधान साहित्याचा इतिहास हा असा आहे. ब्रिटिशकालात महाराष्ट्र समाजात जे आमूलाग्र परिवर्तन झाले त्याचे बव्हंशी श्रेय या विचारप्रधान माहित्यालाच आहे. ललित साहित्यात इतके सामर्थ्य नसते. हरिभाऊ आपटे यांच्यामारखा एखादाच साहित्यिक आपल्या लेखणीने समाजाला वळण लावू शकतो. एरवी सामाजिक घडामोडींचे प्रतिबिंब उमटविणे हेच कार्य ललितवाङ्मय करते. ते करताना कलेचे रंजकत्व न घालविता त्याने भोवतालच्या जीवनाचे वास्तव दर्शन घडविले व त्या जीवनावर भाष्य केले तर त्या साहित्याला फार मोठी उंची प्राप्त होते. मराठी ललित साहित्याने त्या दृष्टीने विशेष मोठे कार्य केले आहे असे वाटत नाही. विचारप्रधान वाङ्मयाने मात्र बाळशास्त्री, लोकहितवादी, विष्णुशास्त्री, आगरकर, टिळक, सावरकर अशा थोर पुरुषांच्या आश्रयाने महाराष्ट्रीय जीवनाची नवी घडी बसविली यात शंकाच नाही.
 मराठी साहित्याचे विवेचन येथे संपले. आता महाराष्ट्रीयांच्या कलोपासनेचे स्वरूप पाहावयाचे आहे.