पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४४५
शिवछत्रपतींची युद्धविद्या
 


आक्रमणाअभावी
 पण रजपुतांच्या अंगचे खरे क्षात्रतेज, गझनीच्या महंमदाच्या स्वाऱ्यांपासून लोपले होते, हेच खरे. ठकाशी ठक होणे, पडता काळ ओळखून तात्पुरती शरणागती पत्करणे, हे त्यांच्या धर्मयुद्धात बसत नसेल, पण शत्रूवर आक्रमण हे तर त्यात बसत होते ना ? पण रजपूत राजांनी एकट्याने किंवा मिळून दिल्लीवर आक्रमण असे कधी केलेच नाही. दिल्लीला मुस्लिमसत्ता स्थापन झाल्यानंतर पुढल्या चारशे वर्षांत किती तरी वेळा भाऊबंदकीमुळे, वायव्येकडच्या स्वाऱ्यांमुळे, सुलतानाच्या नालायकीमुळे दिल्ली अगदी दुबळी झालेली होती. कोणीही येऊन दिल्लीला राज्य स्थापावे असे अशी स्थिती अनेक वेळा झालेली होती; आणि तसे अनेक वेळा घडतही होते. पण असा पराक्रम रजपुतांनी एकदाही केला नाही. रजपूत आपल्या संस्थानी डबक्यातून बाहेर कधी पडलेच नाहीत. उलट शिवाजी महाराजांनी पहिल्यापासून जहागिरीच्या बाहेरच दृष्टी टाकलेली होती. आणि पुढील काळात, वर सांगितल्याप्रमाणे, आक्रमण हीच रणनीती त्यांनी अंगीकारलेली होती. ते आणखी जगते तर दिल्लीवरहीगे ले असते. या आक्रमक रणनीतीमुळेच त्यांना विजय मिळत गेले. रजपुतांनी हीच नीती अनुसरली तसती तर अफगाणिस्थानातच मुस्लिमांना पायबंद बसून दिल्लीपर्यंत मुस्लिम पोचलेच नसते. पण त्यासाठी हिंदवी स्वराज्याचे ध्येय डोळ्यापुढे ठेवावे लागते !

संस्थानी डबकी
 आणि रजपुतांच्या युद्धविद्येतली खरी उणीव हीच होती. असा विशाल ध्येयवाद त्यांच्या ठायी केव्हाच नव्हता. मराठे सरदार जसे वतनासक्त होते तसेच रजपूतही होते. जोधपूर, बिकानेर, जेसलमीर, चितोडं अशी निरनिराळी संस्थाने राजस्थानात होती. त्यांच्या राजांना आपल्या संस्थानापलीकडे सर्व 'राजस्थान' पाहण्याची दृष्टी कधी आलीच नाही. सर्व राजस्थान राष्ट्र एकछत्री करण्याचा तेथे कोणी कधी प्रयत्नही केला नाही. ज्याला त्याला आपल्या अल्पशा जयपूर, जोधपूरचा अभिमान आणि आपलेच कुल श्रेष्ठ, हा दुरभिमान. जयपूर हे जोधपूर वंशापुढे वाकणार नाही, जोधपूर हे बिकानेरपुढे वाकणार नाही. मात्र हे सर्व वंश मुस्लिमांपुढे वाकण्यास कमीपणा मानीत नसत. भूषणच मानीत असत. ते अल्प अभिमान आणि हे वृथा वंशाभिमान त्यांनी टाकले असते, 'रजपूत तेवढा मिळवावा' हे उदात्त ध्येय डोळ्यापुढे ठेवले असते, आणि मऱ्हाष्ट्र राज्याप्रमाणे 'राजस्थान राज्य' स्थापिले असते तर दिल्लीला मुस्लिम सत्ता प्रस्थापित झालीच नसती. ती तशी होऊन अगदी दृढमूल झाल्यावरही ती समूळ नष्ट करण्यात मराठ्यांना यश आले, त्याचे कारण म्हणजे शिवछत्रपती प्रणीत युद्धविद्या हे होय.