पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३९७
मराठा काल
 


शुद्धी
 फलटणच्या बजाजी निंबाळकरला आदिलशाहीने बळाने बाटविले होते. त्याला शुद्ध करून घेऊन त्याच्या मुलाला आपली कन्या देऊन छत्रपतींनी शुद्धिकृतांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न कायमचा सोडवून टाकला. नेताजी पालकराला औरंगजेबाने असेच सक्तीने बाटविले होते. त्यालाही महाराजांनी शुद्ध करून पुन्हा आपल्या ज्ञातीत समाविष्ट करून घेतले.

गोवेकर पाद्री
 पतितांच्या शुद्धीविषयी छत्रपतींचा किती कटाक्ष होता ते पोर्तुगीजांना त्यांनी जी दहशत बसविली तीवरून समजून येते. इंग्रजांच्या कागदपत्रात असे म्हटले आहे की शिवाजीचा व पोर्तुगीजांचा सदासर्वकाळ तंटा सुरू असतो, याचे मुख्य कारण हे की शिवाजीच्या ज्ञातीच्या पोरक्या मुलांना पोर्तुगीज बाटवून ख्रिस्ती करतात. त्या काळच्या गोव्याच्या व्हाइसरॉयने हिंदूंना बळाने बाटवून ख्रिश्चन करून टाकावे, असे घोषणापत्रकच काढले होते. महाराजांना त्यामुळे अतिशय संताप आला. आणि त्यांनी गोव्याजवळच्या बारदेश प्रदेशावर स्वारी करून तेथील चार पाद्रयांचा, त्यांनी बाटविलेल्या मराठा हिंदूंना परत देण्याचे नाकारल्याबद्दल, शिरच्छेद केला. यामुळे गोव्याचा व्हाइसरॉय इतका घाबरून गेला की त्याने तत्काळ आपले घोषणापत्र मागे घेतले.

शस्त्रेण रक्षिते राज्ये, शास्त्रचिंता प्रवर्तते ॥ हेच खरे !



अवतारकार्य
 शिवछत्रपतींनी जे क्रांतिकार्य केले त्यात धर्मक्रांतीला अग्रस्थान होते. त्यांचा अवतार धर्मरक्षणासाठी होता, हे येथवर केलेल्या विवेचनावरून ध्यानात येईल. त्यांचे समकालीन असे पंडित, कवी यांचाही अभिप्राय तसाच होता. अशा काही लोकांनी केलेला शिवगौरव पाहून हे प्रकरण संपवू. कवींद्र परमानंद याने आपल्या शिवभारतात शिवछत्रपती म्हणजे विष्णूचा अवतार असे म्हटले आहे. हा अवतार कशासाठी होता ? विष्णू म्हणतात, 'मी पृथ्वीवर येऊन यवनांचा उच्छेद करीन आणि शाश्वत धर्माची स्थापना करीन, देवांचे रक्षण करीन, यज्ञादी क्रिया पुन्हा सुरू करीन आणि गो-ब्राह्मणांचे पालन करीन.' महाराजांचा समकालीन हिंदी कवी भूषण याने म्हटले आहे, 'हे शिवाजी राजा, तुम्ही आपल्या खड्गाने हिंदुत्वाचे रक्षण केले आहे. पृथ्वीवर आपण धर्म राखला आहे. शिवाजी महाराज झाले नसते तर सर्व हिंदूंची सुनता झाली असती.'

रामेश्वर ते गोदावरी
 कलियुगात देव आणि ऋषिमुनी यांनी हिंदुसमाजाला कलीच्या स्वाधीन केले आणि