पान:महाबळेश्वर.djvu/39

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ६ )



स्त्रियोनाम्ना प्रथां यांतु गायित्र्याः पक्षपाततः ।
गायित्रपि नदी भूत्वा केनापीयं न लक्षिता ॥

याचा भावार्थ असा कीं, तुम्ही गायित्रीचा पक्षपात केलात, त्याअर्थी जलरूप होऊन स्त्री नांवानें जगांत प्रसिद्ध व्हाल, व गायित्रीही नदी होईल व तिजकडे लोक दुर्लक्ष्य करितील. हें ऐकून विष्णूनेही सावित्रीला शाप देऊन उसने फेडिलें व जलप्राय करून टाकिलें. असें होतांच सावित्रीने मोठया त्राग्यानें लागलींच जवळ विलक्षण उंचीच्या कडयावरून उडी घेऊन समुद्रात सत्वर जाऊन मिळण्याचा मार्ग स्वीकारला. असे पाहून तिची समजूत करून तिला परत माघारी आणण्याकरितां ब्रम्हदेवही मागोमाग गेले. परंतु ती परत आली नाही. सावित्रीचे कांठी समुद्रकिना-यापर्यंत १२ लिंगें अंतरानें असलेली पाहून याचा खरेपणा वाटतो. नंतर आरंभिलेला यज्ञ पुढें चालविला असतां त्यास एक मोठे विघ्न उत्पन्न झालें, त्याची हकीकत अशी :-

 महाबळ व अतिबळ या नांवाचे दोन पराक्रमी दैत्य भाऊ भाऊ असत. त्यांनीं तिन्ही लोकांस फार जर्जर केलें. तेव्हां ब्रह्मा विष्णु महेश हे सैन्य घेऊन