पान:महमद पैगंबर.djvu/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५६ पाकिस्तानचे संकट वरिष्ठ कायदेमंडळांतल्या हिंदी सभासदांतले तृतीयांश सभासद मुसलमान असावे व त्यांची निवडणूक स्वतंत्र मतदारसंघांतर्फे व्हावी ही गोष्टहि या कराराने मान्य करण्यांत आली.* . २५ वर्षांनंतरची म्हणजे आजची परिस्थिति लक्षात घेऊन बोलणा-याला या कराराविरुद्ध पुष्कळच बोलतां ये ल आणि करार झाल्याबरोबर कांहीं गोष्टी त्याच्याविरुद्ध बोलल्या जाऊ लागल्याहि ! पंजाब व बंगाल हे दोन प्रांत असे आहेत की, तेथे मुसलमानांचे संख्याधिक्य असले तरी ते बेताबाताचेच आहे ! अशा प्रांतांतून संयुक्त मतदारसंघ आग्रहाने सुरू व्हावयाला पाहिजे होते अशी टीका करता येईल, नाहीं असें नाहीं ! पण, आग्रह धरून संधि गमावण्यापेक्षां, देवाणघेवाण करून संधि साधणे हेच टिळकांना श्रेयस्कर वाटलें . असावें ! ‘याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्याशिवाय वगैरे सूत्र हल्ली हिंदुसभावादी वारंवार बोलतात. ते टिळकांनी कधीं बोलून दाखविलें नसेल ! हिंदु-मुसलमानांच्या ऐक्याविना स्वराज्य अशक्य असेहि त्यांनी मोठ्याशा अट्टाहासाने कधीं प्रतिपादिले नाहीं ! बोलण्यापेक्षा कृतीचेच महत्व ते जास्त मानीत आणि आलेल्या संधीचा राष्ट्रदृष्ट्या पुरेपूर फायदा कसा घ्यावयाचा याच चिंतनांत त्यांची समयज्ञ बुद्धि गर्क असे ! मुसलमानांशीं ऐक्य साधावे म्हणून त्यांनी कोणाच्या बंगल्यांवर खेटे घातले नाहींत अगर कोन्या चेकांची अवईहि उठविली नाहीं ! मुसलमानांसह कांहीं व्हावयाचे असेल तर ते मुसलमानांच्या अडीअडचणीच्या वेळीं जागरूक राहिल्यानेच होईल, हे त्यांना पुरें माहीत होते ! परकीयांपासून अधिकार मिळविण्याच्या बाबतींत जाणत्या हिंदूचे मन सदैव तयारच आहे. स्वतःवरील कांहीं प्रसंगामुळे मुसलमानांचे मन तसेच तयार होत आहे की काय हे पाहून, * तप्तेन तप्तमयसा घटनाय योग्यम्' या न्यायाने मुसलमानांच्या तत्परतेचा फायदा घेऊन, पुढे जाण्याला हरकत नाहीं असें टिळक मानीत असावे १९१२-१३ पासून मुसलमानांच्या वृत्तींत राज्यकर्त्यांच्या धोरणांविषयीं पूर्वीइतका निःशंकपणा शिल्लक राहिलेला नाहीं हें टिळकांच्या सूक्ष्म दृष्टीला दिसत होते. वरिष्ठ कायदेमंडळाच्या हिंदुसभासदांनीं जी सुधारणांची

  • Report of the Indian Statutory Commission, Vol. I, Survey, Pp. 187-188.