पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

या विवेचनाच्या आतापर्यंतच्या भागावरून एवढे स्पष्ट आहे की, पानिपतच्या मोहिमेचे अपयश जर कोणाच्या माथी मारावयाचे असेल तर त्या शिक्षेला गोविंदपत बुंदेले हाच सर्वथैव पात्र आहे. अबदालीच्या पेचामुळे गोविंदपंताला भाऊकडे येतां आलें नाही असा बिलकुल प्रकार नव्हता. मुद्दाम बहाणे करून व सबबी सांगून ह्या गृहस्थाने भाऊला मदत करण्याचे टाळिलें व आपल्या ह्या देशावर महत् संकट आणिलें. गोविंदपंतानें सदाशिवरावभाऊला मदत तर केली नाहीच, परंतु सुजाउद्दौला, अवदाली, अलीगोहर, मीरजाफर ह्या लोकांकडील बातमी देखील जी वेळोवेळ पाठविली ती पुष्कळदां खोटी असे. खरी वातमी काढावयाचाहि ह्या नीच गृहस्थाने प्रयत्न केला नाही. लेखांक २२६ त गोविंदपंत लिहितो की अबदाली शुक्रतालावर जाऊन छावणी करणार आहे. परंतु ही बातमी खरी नव्हती. वास्तविक प्रकार असा होता की अबदाली शिकंदन्यावरच होता. लेखांक २२७ त गोविंदपंत लिहितो की मीरजाफर, मिरन व रामनारायण यांना खातरजमेचे पत्र पाठवावें. परंतु वास्तविक प्रकार असा होता की जुलैंत मिरन वीज पडून मेला, मीरजाफर मेला किंवा कलकत्त्यास गेला ह्याचा पत्ता नव्हता व पाठणा येथील सर्वाध्यक्षत्व रामनारायणाकडे आले होते. दोन्ही पत्रांत केलेल्या चुका गोविंदपंताला सदाशिवरावाने दाखवून दिल्या आहेत. येणेप्रमाणे गोविंदपंताच्या खोटेपणाचा हा असा वृत्तांत आहे. दुसरा अपराधी इसम ह्मटला ह्मणजे मल्हारराव होळकर होय. ह्याच्या कृत्यांची याद मागें मी १७६० पर्यंत आणून पोहोंचविली आहेच. तीत १७५४ व १७५५ त जयाप्पाला दगा करण्यासंबंधीची त्याने केलेली सूचना व १७६० त दत्ताजीला साहाय्य करण्यास केलेला दिरंग ह्यांचा उल्लेख झालाच आहे. आतां पानिपतच्या मोहिमेंत ह्याने काही स्वदेशाच्या अहिताची कृत्ये केली आहेत किंवा कसें तें पहावयाचे आहे. नजीबखान, सुजाउद्दौला, माधोसिंग, बिजोसग व सुरजमल जाट ह्यांच्याशी मल्हाररावाचे रहस्य वाजवीहून फाजील होते हे सर्वप्रसिद्ध आहे व ह्या ग्रंथांतूनहि त्याचा अधूनमधून उल्लेख आला आहे. लेखांक २०२ त “अबदालीस खूव तंबी करावी; मल्हाररावाचा या गोष्टीविशी संशय न आणावा; तेहि याच कामावर तयार आहेत" ह्मणून सदाशिवरावभाऊनें सुजाउद्दौल्याला लिहिले आहे. ह्यावरून एक गोष्ट निष्पन्न होते. ती ही की अबदालीस तंबी देण्याचा मल्हाररावाचा निश्चय झाला नव्हता किंवा इच्छा नव्हती असा संशय येण्यास सुजाउद्दौल्याला कारण झाले होते. मल्हाररावाच्या मनांत नजीबखानाला राखावयाचे फार पींपासनच होतें. अबदालीला तंबी द्यावयाची ह्मणजे नजीबखानालाहि तंबी व्हावयाचोच. तेव्हां अबदालीचें पारिपत्य करण्याची इच्छा मल्हाररावाची नव्हती असा संशय दृढ होण्यास कांहीं कारणे आहेत हे स्पष्ट आहे. प्रस्तुत ग्रंथांत मल्हाररावासंबंधी पत्रव्यवहार बहुतेक मुळीच नसल्यामुळे, मल्हाररावाविरुद्ध साक्षात् पुरावा काहाँच आणितां येत नाही. परंतु मल्हाररावाच्या पूर्वीच्या वर्तनावरून व लेखांक २०२ तील सुजाउद्दौल्याच्या संशयावरून ह्या गृहस्थाने पानिपतच्या मोहिमेंत व युद्धांत कुचराई केली असावी असा