पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

o g Ellen .. ५. परंतु, काव्येतिहाससग्रहांत व इतरत्र छापलेल्या पत्रांची किंमत फारच निराळ्या प्रकारची ह्मणजे अत्यंत महत्त्वाची आहे. ह्या महत्त्वाचे कारण सर्वांच्या सहज ध्यानात येण्याजोगे आहे. ६. ह्या पत्रांच्या साहाय्यानेच बखरीतील मजकुराच्या खरे। खोटेपणाचा निर्णय व्हावयाचा आहे; बखरीतील काल विपर्यासाचा परिहार हीच पत्रे करितील; व बखरीत व जी माहिती दिली नाही ती हीच पत्रे देतील. (अ) काव्येतिहाससंग्रहांत एकंदर ५०१ पत्रे व यादी आहेत. पैकी नं. २० चे पत्र व नं. १ चे पत्र ही एकच असल्यामुळे खरोखर ५००च पत्रे आहेत. १ शहाजीच्या कार कीर्दीसंबंधी, २ शिवाजीच्या कारकीर्दीतील, १ राजारामाच्या कारकीर्दीतील, ५ बाळाजी विश्वनाथाच्या कारकीर्दीतील, २६ वाजीराव बल्लाळाच्या कारकीर्दीतील, १५९ बाळाजी बाजीरावाच्या कारकीर्दीतील, ३२ माधवराव बल्लाळाच्या कारकीर्दीतोल, २३४ माधवराव नारायणाच्या कारकीर्दीतील,२१वाजीराव रघनाथाच्या कारकीर्दीतील,२ इंग्रजीतील,३शकावली, ७ वंशावली. पहिशेबी, किरकोळ, मिळून ५०१ पत्रे व यादी होतात. पैकी ४३८,४९४,४९५ ह्या लहान लहान बखरी आहेत. तिन्हीं शकावलीपैकी दोन मोठ्या विश्वसनीय आहेत असें नाहीं. वंशावळींतहि बहुतअपूर्णता आहे. वाकी राहिलेली पत्रे मात्र पूर्ण पणे विश्वसनीय व अस्सल आहेत; परंतु, ती संगतवार अशी फारच थोडी असल्यामुळे त्यांचाहि इतिहासाच्या कामी उपयोग मटला ह्मणजे रचनेपेक्षां पुराव्याच्यारूपाने विशेष होण्यासारिखा आहे. शहाजी, शिवाजी, राजाराम, बाळाजी विश्वनाथ, बाजीराव बल्लाळ, माधवराव बल्लाळ, नारायणराव बल्लाळ, माधवराव नारायणाच्या कारकीदीतील पहिली सहा वर्षे व पुढली दहा वर्षे, बाजीराव रघुनाथ व अव्वल इंग्रजी ह्यांसंबंधी पत्रे मुळीच नाहीत ह्मटले असतां चालेल. अर्थात् ह्यांच्या कारकीदींसंबंधी माहिती ह्या संग्रहांत प्रायः नाही. बाकी राहिले वाळाजी बाजीराव प माधवराव नारायण; पैकी माधवराव नारायणाच्या कारकीर्दीतील साळवाईच्या तहाच्या वेळची, एकदोन वर्षे अलीकडची व महिना दोन महिने पलीकडची, अशी पत्रे काव्येतिहाससंग्रहांत सुमारे १८० आहेत. माधवराव नारायणाची बाकीची कारकीर्द बहुतेक रिकामीच आहे. बाळाजी बाजीरावाच्या कारकीदींसंबंधी पत्रे पहातां उदगीरच्या व पानिपतच्या मोहिमेसंबंधी एकादें दुसरेंच जुजबी पत्र ह्या संग्रहांत सांपडते. उदगीरच्या लढाईसंबंधी १७० वें पत्र व पानिपतच्या लढाईसंबंधी ५३, १७१ व १७५ एवढीच काय ती पत्रे आहेत. पैकी १७१ कुशलार्थाचेंच आहे. ५३ वें पत्र नाना फडणविसानें आत्मचरित्र ह्मणून लिहिलेले आहे. बाळाजी बाजीरावाच्या कारकीर्दीसंबंधी एकंदर १५९ . पत्रे आहेत ह्मणून वरती सांगितलेच आहे. त्यांतून ही चार वजा करितां बाकी राहिलेली १५५ पत्रं इ० स० १७४० पासून १७६१ पर्यंतच्या अवधींतील काही ठळक ठळक प्रसं