पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

च्या पौर्वापर्याचे महत्व ह्या वखरनविसांच्या अगदीच लक्ष्यांतून गेले. कालाविपर्यासाचा दोष अत्यंत कमी पटला ह्मणजे “ भाऊसाहेबांच्या बखरीत ” अतिच कमी आहे; व अत्यंत जास्त पहावयाचा असल्यास “ पेशव्यांच्या बखरीत” अमूप आहे. ह्या दोन आद्यंताच्या मध्ये इतर सर्व वखरींचे वर्गीकरण दोषांच्या न्यूनाधिक्याच्या प्रमाणानें करितां येईल. ४. निरनिराळ्या प्रसंगांचे अन्योन्य महत्व ह्या बखरींतून ... मुळीच दाखविले नाही व क्षुल्लक गोष्टींचा निरर्थक पाल्हाळ मात्र केला आहे. [अ] (१) शिवाजीची सूर्यवंशापासून उत्पत्ति, ( २ ) शिवाजीच्या मरणसमयीं त्याच्या कोठारांतील दाण्यागल्याची याद,(३) भाऊसाहेबाच्या बखरीतील मलकाजमानीचे रडगाणे इत्यादि कथा कमजास्त कल्पित असून क्षुल्लक आहेत. त्यांचा अन्यदृष्ट्या कितीहि उपयोग असला तरी इतिहासदृष्ट्या फारच थोडा आहे. [ब] (१)शिवाजीच्या पूर्वीच्या व त्याच्या वेळच्या मुसुलमानी राज्यांची माहिती, (२) शिवाजीच्या कोणत्याहि मोहिमेचा संगतवार वृत्तांत, (३) शिवाजांच्या किंवा पेशव्यांच्या गृहस्थितीची चोख हकीकत ह्या बखरींतून बिलकुल मिळण्यासारिखी नाही. जी काही थोडी बहुत माहिती दिली आहे ती इतकी असंबद्ध, परस्परविरोधी, संदिग्ध व प्रायः अविश्वसनीय आहे की, इतर साधनांच्या साहाय्यावांचून त्यांपैकी कोणतीहि एक खरी मानणे मोठे संकटाचे आहे. [क] अस्सल कागदपत्रांच्या साहाय्याव्यतिरिक्त ह्या बखरी वाचूं गेलें असतां एक प्रकारची चमत्कारिक चूक होते. ह्या बखरीतून जो मजकूर खरा असतो तो त्यांत असलेल्या खोव्या मजकुरापासून विलग काढून घेता येत नाही. सारांश, केवळ ह्या बखरींवर भिस्त ठेवून इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केल्यास, सत्यासत्यतेच्या निर्णयाची कसोटी जवळ नसल्यामुळे, तो वायफळ जाण्याची बहुतेक खात्री आहे. पुष्कळ बखरीतून एकच मजकूर एकसारिखा आल्यास, वहुमताच्या न्यायाने, तो खरा मानण्याचीहि ह्या बखरींच्या संबंधानें सोय नाही. पुष्कळ ऐतिहासिक गोष्टींच्या अभावाचे साधारणत्व ह्या बखरीतून सांपडतें; परंतु, तेवड्यावरून त्या गोष्टी झाल्याच नाहीत असे विधान करणे मोठे धोक्याचे काम होईल. तात्पर्य, एक अस्सल चिटोरें सर्व बखरींच्या बहुमताला हाणून पाडण्यास बस्स आहे. ह्या संबंधाने विचार करितां Majority of documents वर फारशी भिस्त ठेवितां येत नाही. कांकी विश्वासार्ह अस्सल कागदाच्या एका चिटोऱ्यावर जितका विश्वास ठेवितां येतो तितका स्वदेशीय व विदेशीय बखरकारांच्या व बखरवजा इतिहासांच्या भाकड कथांवरती अर्थात् ठेवितां येत नाही. ही स्थिति ह्या बखरींची झाली.