पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जाण्याचे नाकारावें असेंच होते. कारण, ह्या वेळी प्रसंग फार बिकट होता. माधोसिंग, विजेसिंग, पृथुसिंग, नजीबखान, मल्हारराव, गोविंदपंत व अबदाली असल्या गृहशबूंच्या च परशत्रूच्या पुढे राघोबासारख्या भोळया सांचाचा टिकाव क्षणभरहि न लागता. असल्या चांडाळचौकडीचा खरपूस समाचार घेण्यास सदाशिवरावभाऊसारखाच पंचतंत्री मुत्सद्दी हवा होता. तेव्हां हिंदुस्थानांत त्याची रवानगी करून देण्यांत बाळाजी बाजीरागनें आपल्या विचारशक्तीचा केवळ गौरव केला असेंच कबूल करणे भाग पडते. बाळाजी बाजीरावाने सदाशिवरावभाऊची जी निवड केली ती यथायोग्य होती. कारण, सदाशिवरावभाऊ जसा उत्तम मुत्सद्दी मगून नावाजला गेला होता तसा लढवय्या सरदार ह्मणूनहि त्याचा चांगला लौकिक होता. १७४७ त सदाशिवरावभाऊनें बहादूरभेड्याची स्वारी केली (का० पत्रे, यादी ६८). १७५० त यमाजी शिवदेवाचें बंड त्याने स्वतः जाऊन मोडिले. १७५१ च्या मार्चात बाळाजीनें सलाबताला तुंगभद्रेवर अडविले त्या वेळी भाऊ त्याच्याबरोबर होता. १७५१ च्या नोव्हेंबरांत सलाबत बुसीला घेऊन कोरेगांवास आला तेव्हां भाऊ लढाईत हजर होता. १७५२ च्या डिसेंबरांत भालकीची लढाई झाली तीत तो होता. १७५३ च्या जानेवारीत श्रीरंगपट्टणची स्वारी झाली तींतहि भाऊ व रामचंद्रबाबा शेणवई हे दोघे होते. १७५४ च्या होळीहोनूरच्या स्वारीत भाऊ तीन दिवस मोच्योत होता. १७५५ च्या सावनूरच्या स्वारीत भाऊ हजर होता. १७५७ च्या श्रीरंगपट्टणच्या स्वारीत भाऊ मोच्यात होता. १७५८ च्या जानोजी भोसल्यावरील टेहळणींत भाऊ होता. १७६० त उदगीरची लढाई भाऊ व विश्वासराव ह्या दोघांनी चालविली. सारांश, भाऊला लढाईचा सराव सारखा तेरा वर्षे होता. रघुनाथरावाची पहिली मोहीम १७५० त झाली. ह्मणजे १७६० पर्यंत रघुनाथरावाला लढाईचा सराव सरासरी दहा वर्षे होता. रघुनाथरावाची तडफ व भरारी ह्या गुणांबद्दल जशी ख्याती होती तशी भाऊची युक्ति व दूरदर्शीपणा ह्यांबद्दल प्रसिद्धि होती. रघुनाथराव फार मेहनत करून थोडें फल मिळवी; सदाशिवरावभाऊ थोड्या युक्तीने फार लाभ करून घेई. रघुनाथरावाने लाहोरापर्यंत भटकून पुष्कळ शत्रु व बरेंच कर्ज पैदा केलें. सदाशिवरावभाऊनें जवळच्या जवळ सलाबतजंगावर स्वाऱ्या करून दीडदोनकोटींचा मुलूख मिळविला व शहानवाजखान, सय्यदलष्करखान व मुस्साबुसी अशांचा स्नेह जोडिला. दत्ताजी शिंदे, नाना पुरंदरे, महीपतराव चिटणीस असले सज्जन सदाशिवरावाच्या प्रीतींतले व मल्हारराव होळकर, सखारामपंत बोकील व सखाराम हरी असले दुर्जन रघुनाथरावाच्या मर्जीतले. तात्पर्य, सदाशिवरावभाऊ व रघनाथरावदादा ह्या दोघांत जमीनअस्मानाचें अंतर होते. हे बाळाजी बाजीराव १७४२ पासून जाणून होता (टीप ११३ पहा). महादोबा पुरंधयनेंहि भाऊसाहेबाविषयी असेंच मत दिले आहे ( र०या० पाणिपतची बखर, पृष्ठ ८ ) १७६० च्या १५ मार्चाला सदाशिवरावभाऊनें पडदुराहून हिंदुस्थानास जाण्यास कुच केलें (टीप २५६ पहा). देशी व कनाटकांत सलाबतजंग व हैदर यांच्यावर दवाव राखण्या