पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बंदोबस्त करून काशी, प्रयाग व बंगाला ह्या प्रांतांवर पूर्वेकडे स्वारी करावयास सांगितले; दत्ताजी प्रयागास पोहोचतो न पोहोचतो तोच रघुनाथरावाने १७५९ च्या सप्टंबरांत दक्षिणेतून बंगाल्यांत दत्ताजीला जाऊन मिळावें, तो प्रांत आसमुद्र जिंकून टाकावा व सुजाउद्दौल्याने मदत केल्यास त्यापैकी अर्धा प्रांत त्यास द्यावा, असें ठरविलें (का० पत्रे, यादी ३६२, ३७३, ३८७, ३८८). हिंदुस्थानची व्यवस्था दत्ताजी, जनकोजी व रघुनाधराव यांजकडे सोपवून, दक्षणची व्यवस्था करण्याचे काम सदाशिवरावभाऊ, बाळाजी बाजीराव व विश्वासराव ह्या तिघांनी आपल्याकडे घेतले. दक्षणेत ह्या वेळी मराठ्यांना दोन प्रतिस्पर्धी होते:-एक सलावतजंग व दुसरा श्रीरंगपट्टणचा कुंभार राजा व त्याचा सरदार हैदरअल्ली. ह्या दोघांची रग जिरविली ह्मणजे आसमुद्र दक्षण मोकळी झाली. गोपाळराव पटवर्धनाला लिहितां लिहितां बाळाजी बाजीराव ह्मणतो, “पन्नास हजार फौज जमा करून अगदी मोगल दक्षिणेत होता की नव्हतासा करूं" ( ऐतिहासिक लेखसंग्रह १५). तसेंच १७६० च्या फेब्रुवारीत गोंविंद बल्लाळाला सदाशिव चिमणाजी लिहितो, “ कर्नाटकची स्वारी न झाली; तिकडेहि अबदालीचा पेंच ; पैका मिळायाचे झाले नाहीं; नाही तरी सारी दक्षिण मोकळी होतो" ( लेखांक १६६ ). १७६० त सेतुबंधापर्यंत दक्षण मोकळी करावयाची असा पेशव्यांचा बेत होता. हा बेत करण्यांत परदेश जिंकण्याच्या उच्छंखल मनावृत्तीचे प्राबल्य यत्किचिहि नसून सर्व घटना, योग्य असा सारासार विचार करून पशव्यांनी जुळवून आणिली होती. श्रीरंगपट्टण, हिंदराज्य कलंडण्याच्या बेतांत आले होते; सलावतजंग अर्धाअधिक पेशव्यांनी गिळलाच होता व हिदुस्थानांत क्षुद्र नजीबखानाखेरीज ह्मणण्यासारखा शत्रू मराठ्यांना राहिला नव्हता. दक्षण मोकळी करण्याकरितां होणाऱ्या स्वारीचे सदाशिवरावाने दोन भाग केले. पहिल्या भागांत सलावतजंगाचा चुराडा करण्याचे ठरविले व दुसऱ्या भागांत तसेंच पढ़ें कर्नाटकांत जाऊन श्रीरंगपट्टण घेण्याचे योजिलें. सलाबतजंगावर स्वारी करण्यास पेशव्यांस एक कारण होते. ते हे की, शिंदखेडची लढाई झाल्यावर निजामअल्लीने पेशव्यांस दहा लाखांची जहागीर व नगर व परांडा असे दोन किल्ले देण्याचा करार केला असून तो करार अंमलात आणण्याचा निजामअल्ली अनमान करूं लागला (लेखांक १५४ ). यास्तव १७५९ च्या दसऱ्यास डेरेदाखल होऊन फौज जमा करणे सदाशिवरावभाऊला प्राप्त झाले. सर्व फौज जमा होईतोंपर्यत झणजे १७५९ च्या नोव्हेंबरपर्यंत सदाशिवरावभाऊ पुप्याजवळ गारपिरावर डेरे देऊन होता (टीप २३१ पहा ). विसाजी कृष्णानें कविजंगाशी फितूर करून नगरचा किल्ला १० अक्टोबर १७५९ (लेखांक १४७ ) ला घेतला अशी बातमी भाऊला तेथें कळली (टीप २१७ पहा ). नोव्हेंबरांत भाऊला दगा करण्याचा विचार मुजफरखानाने केला: परत तो फसला (लेखांक २३१). नंतर, भाऊ, दादा, नाना व विश्वासराव निजामावर निघाले (टीप २१९ पहा). नाना नगरास गेले व भाऊ, दादा व विश्वासराव राक्षसभुवनाकडे गेले (लेखांक १४९ ). करार केलेली जाहागीर देण्यास मोगल ह्या वेळी