पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दत्ताजींच्या ठायीं कितपत भक्ति होती तें स्पष्ट ध्यानांत येण्यासारखे आहे (लेखांक १४७). गोविंदपंत कविले बुणगे घेऊन पाठीमागे राहिला त्यांत गाजुद्दिन वजीरहि होता.१० नोव्हेंबराच्या सुमाराला अलमगीर पातशाहाला ठार मारून गाजद्दिन नोव्हेंबराच्या १४।१५ तारखेला मराठ्यांच्या सैन्यांत सामील झाला होता (लेखांक १४३). त्याला घेऊन गोविंदपंत मथुरेकडे गेला व दत्ताजी अवदालीची टेहळणी करीत राहिला. दत्ताजीच्या व अवदालीच्या दोन चार झटापटी होऊन २४ डिसेंबरी एक मोठे युद्ध झाले. त्यांत मराठ्यांना यश आले (लेखांक १५७). ३ जानेवारी १७६० ला अंतर्वेदीत शिरून अबदाली शुक्रताली रोहिल्याला मिळाला व तेथून त्याने दिल्लीचा रोख धरिला (लेखांक १६४), इकडे कुंजपुन्याहून दत्ताजी शिंदेहि दिल्लीस यमुनेच्या दक्षिणतिरी येऊन पोहोचला. अबदाली व दत्ताजी ह्यांच्यामध्ये यमनेचे पात्र तेवढे राहिले होते. १० जानेवारी १७६० ला अबदालीचे व दत्ताजीचें दिल्लीजवळ बडाऊंच्या घाटी मोठे तुंबळ युद्ध झाले व त्यांत मराठ्यांचा पराजय होऊन दत्ताजी शिंदे रणांत राहिला (लेखांक १६५ ). जनकोजी तेथून पळून कोटपुतळीस आला व तेथे १२ जानेवारी १७६० ला त्याची व मल्हारराव होळकराची गांठ पडली (लेखांक १५३ व१६५).१७५९ च्या नोव्हेंबर महिन्यांत अंतर्वेदीत शुक्रताली रोहिल्याशी लढत असतां जेव्हां अबदाली आल्याची बातमी आली तेव्हांच दत्ताजीनें मल्हाररावाला मदतीस येण्याकरितां पते पाठविली होती. परंतु बलवडा, झिलाडा वगैरे भिकार ठिकाणे जयनगर प्रांती घेत बसून मल्हाररावाने दोन महिने व्यर्थ दवडिले. पेशव्यांनीहि मदतीस जाण्याबद्दल मल्हाररावाला वारंवार पत्रे पाठविली (लेखांक १६१). “ मल्हारबांनी आधी काम कोणतें करावें. मग कोणतें करावें, माधोसिंगाचा मजकूर काय ? जेव्हां झटले तेव्हां पारपत्य होते तो विचार त्यांनी न केला" (लेखांक १५७), ह्याप्रमाणे दोष देऊन, पुढे लेखांक १५८ त " मल्हारवास वारंवार पत्रं रवाना केली आहेत, परंतु, त्याचे प्रकृतीस तुह्मी जाणता," ह्मणून पेशव्यांनी मल्हाररावाचा दुष्ट हेतुहि उघड करून दाखविला. मल्हारराव शिंद्यांना जर १७५९ च्या नोव्हेंबरांत मिळाला असता तर रोहिले व सुजाउद्दौला यांचें पारपत्य होऊन अबदाली एकटा राहता व त्याचे पारपत्य ह्या दोघां सरदारांना सहजासहजी करितां आले असतें. रघुनाथरावदादाचेंहि असेंच मत होते ( लेखांक १५२). “ दोन्ही सरदार येकत्र असलियास उत्तम रीतीने पटाणाचे पारपत्य होईल; पठाणांत काही फार बल नाही व त्य.नां मागील वर्षी दहशतहि खादली आहे. सारांश, एकदिल फौज असलिया तें काम सहजांत आहे," असें रघनाथरावाने लिहून पाठविले. परंतु मल्हाररावाच्या मनांत शिंद्याविषयी अढी पक्की बसली होती. शिंदे पेशव्यांच्या मताने चालतात; नजीबखानाला मारून टाकून पेशव्यांचे राज्य निष्कंटक करून टाकण्याचा शिंद्याचा आत्मघाती प्रयत्न आहे; हिंदुस्थानांत एखादा तरी " खळी” ठेवण्याचा आपला विचार शिंद्यांना पसंत नाही; इत्यादि कुकल्पना मनांत धरून मल्हाररावाने शिंद्यांना साहाय्य करण्याचे लांबणीवर टाकिलें व शिंद्याचा सर्वस्वी नाश झाल्यावर कोटपुतळीस जनकोजीस येऊन तो भेटला