पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लोभ धरून मेळविली अब्रू गमविणे ” योग्य नाहीं असें त्यास उमजून आले. तेव्हां आपल्यास संभाळून घ्यावे ह्मणून त्याने येरंड्यांची खुशामत करण्यास आरंभ केला." मी येथे गुंतलों नसता तर सर्व जमीदार तुह्मास भेटते; कामकाज सर्व सुती लागते; तें न जालें; याजकरितां तुह्मासहि वाईट लागलें ; तुमचें मनी संशय आला; ( कां की) दोन वर्षे झाली, कांहींच परगण्याचे अवसान न सांपडे ; हेहि खरेंच ! तुह्मास तरी काय शब्द !' तेव्हां "जर तुह्मास आमचे बरे करणे तर तुह्मी देशास प्रस्तुत न जाणे" कारण "श्रीमंत स्वामीची मर्जी एक प्रकारची जाली. " ही असली खुशामत करून गोविंदपंताने येरंड्याला १७६० च्या एप्रिलपर्यंत थोपवून धरिलें. पुढें खुद्द सदाशवरावभाऊ हिंदुस्थानांत येऊ लागले तेव्हां येरंड्यांना गोविंदपंताविरुद्ध गा-हाणी सांगण्यास दक्षिणेत जाण्याची जरूरच पडली नाही. १७६० च्या एप्रिलपासून १७६१ च्या जानेवारीपर्यंत सदाशिवरावभाऊ हिंदुस्थानांत होते, त्या अवधीत येरंड्याप्रमाणेच सदाशिवरावभाऊलाहि गोविंदपंतानें असेंच फसविले. ह्यासंबंधानें लेखांक २०१, २११, २१६, २१७ अ, २२४, २२७, २२९,२३०, २३७, २३९, २४२, २५७, २५९ ही पत्रे अवश्य वाचण्याची शिफारस मी वाचकांस करितो. त्यावरून गोविंदपंताच्या नीचपणाची इयत्ता वाचकांना स्वत:च ठरवितां येईल. बायाबापडयांना ( लेखांक ६० ), देवाब्राह्मणांना (लेखांक १९३ ) व खुद्द स्वतःच्या धन्याला (लेखांक २६८ ) हि फसविण्याला व बुचाडण्याला ह्या मनुष्याने कमी केलें नाही. सारांश, पैशाची अफरातफर करून गोविंदपंताने पेशव्यांची गैरमर्जी संपादिली व प्रत्याघातन्यायाने तो त्यांचा द्वेष करूं लागला. येणेप्रमाणे हिंदुस्थानांत मल्हारराव होळकर, गोविंदपंत बंदेले वगैरे सरदार-मामलतदारांच्या उद्योगाचा वृत्तांत १७६० पर्यंत आणून पोहोंचविला आहे. पुढील कलमांत पानिपतच्या मोहिमेचे अत्यंत संक्षिप्त वर्णन देऊन त्यांत ह्या गृहस्थांनी व विशेषतः गोविंदपंत बुंदेल्याने काय काय दुष्कृत्ये केली त्याचे दिग्दर्शन करितों. (क) १७४८ त अबदालीने हिंदुस्थानावर पहिली स्वारी केली. त्या स्वारीत यद्यपि तो दिल्लीपर्यंत आला नाही व त्याचा सरहिंदास मीरमनू व सफदरजंग यांनी पराभव केला तत्रापि त्याच्या सर्वनाशक शक्तीचा त्यांना चांगलाच अनुभव येऊन चुकला. अबदालीपुढे टिकाव धरण्याचे सामर्थ्य हिंदुस्थानांत दिल्लीचा पातशाहा किंवा त्याचे अमीर ह्यांच्यांत बिलकुल राहिले नव्हते. तेव्हां दक्षिणेतील सरदार मल्हारराव होळकर व जयाप्पा शिंदे ह्यांच्या हातून अबदालीचें पारपत्य झाल्यास पहावे या हेतूने सफदरजंगाने ह्या दोघा सरदारांशी अबदालीला तंवी देण्याबद्दल करार केला. त्यांत लाहोर, मुलतान, रोहिलखंड व रजपुताना ह्या चार मुलखांची चौथ त्याने मराठ्यांना देण्याचे कबूल केलें; अशा अटीवर की त्यांनी अबदाली, रोहिले, रजपूत व सिंध प्रदेशांतील अमीर ह्यांना तंबी द्यावी व दिल्लीच्या पातशाहाचें परचक्रापासून व राज्यांतील अमीरांपासून संरक्षण करावें. ह्या कराराच्या अन्वयें मराठ्यांनी १७५१ त रोहिल्यांशी लढाई केली. मराठे रोहिल्यांशी लढाई करीत