पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/525

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२९७ ॥ श्री ॥ ५ आगष्ट १७६१. पु॥राजश्री जनार्दनपंत स्वामीचे सेवेसि. विनंति उपरि नजीबखान रोहिले यांणी इंद्रप्रस्थीं सर्व किल्याचा सुद्धा बंदोबस्त करून पाणीपताकडे जाऊन बहादरखानबलोच्याशी स्नेह संपादून बागपताकडे अंतरवेदीत आले. शिकंदराबादेकडे येणार. रोहिलेचार, बलोच , सुजातदौला, पठाण, साताचें येक मत आहे. पटण्यास पातशाह आहे, त्यास आणून दिल्लीस स्थापना करून बंदोबस्त करावा. गाजदीखानास जाटाचे विद्यमानें वजिरी दिली. परंतु त्याशी व रोहिले सुज्यातदोल्याशी पेंच. किल्यात बंदोबस्त नजीबखानाचा. पातशाह स्थापिला. यासि बजिराशी द्वेष, याचा वजिरी कोण रीतीनें चालेल ? किल्यांत जाणे तर पांच माणसांनिसीं वजिराने जावे. असा प्रकार जाहल्यानंतर गाजदीखान किती दिवस राहतील, त कळतच आहे. जाटाशी रोहिल्याशी पेंच पडला. तशाहिमध्ये आगऱ्याचे किल्यास मोरचे लाविल्याने पातशाही हरामखोरी ठहरली. पातशाह पटण्याहून तीन मजली आलीकडे आला. तो फिरंग्याच स्वाधीन. सर्व अधिकार फिरंग्याचा तेथे आहे. हिंदुस्थानी कोणी नाही. मिरजा कोचक प्रयागचा किल्लेदार सोडून देणे ह्मणून पातशाहाचा हुकूम जाहला असतां सुजातदोल्याने जिवे मारिला. यामुळे पातशाहासी सुजातदोल्याशी पेंच जाहला. यास्तव सुजातदौला पातशाहास आणावयास जीवनपूरपर्यंत गेला होता तो एक मजल माघारा अयोध्येचे रोखें फिरला, ह्मणन बातमी आली आहे. फिरोन वकीलहि परस्परें गेले आहेत. चोहीकडे दंगाच आहे. ईश्वर काय करील पहावें. आपण आजपर्यंत पुण्यास दाखल जाहलेच असतील. तिकडील तपशिलवार वर्तमान सर्व लिहून पाठवावें. आह्मीहि इकडील कांहीं स्वस्थता झाली ह्मणजे महिना पंधरा राजी एकजण येऊ. भेटीनंतर सविस्तर कळेल. सागरचे आपाजीपंत ठार जाहले, यामुळे तेथील हिशेब आले नाहीत. आह्मीं पत्रे बहुत पाठविली. विसाजीपंत सागरी गेले हणजे हिशेब सत्वर पाठवितील. राजश्री मल्हारजीबावा या प्रांतांतून गेले. प्रस्तुत इकडे तात्या आहेत. रोहिल्याची