पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/441

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[२११ ] पे॥छ २० जिलकाद. ॥ श्री ॥ २७ जून १७६०. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः पो॥ सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणे. विशेष. येथे ऐवजाची निकड फार आहे ह्मणोन तुह्मांस वारंवार लिहीत असतां कांही तरतुद करून ऐवज रवाना केला आहे ह्मणोन तुह्मी लिहिता. त्यास, पन्नास हजार रुपये रवाना केले आहेत ह्मणोन बातमी कळली. ऐशास, तुह्मी मातबर मामलेदार. जे समयीं जसा पैका आणवू तसा तुह्मांकडून यावा. दिरंग लागो नये. ऐसें असोन तुहीच दिरंगावरी घाला लागल्यास दुसन्या मामलेदारांस काय शब्द लावावा ? तुझी या॥ करूं नये. तुझांकडून चवदापंधरा लाख ऐवज यावा. त्यापैकी तुर्त पांचसात पाठवणे ह्मणोन लिहिले असतां अद्याप ऐवज येत नाही हे अपूर्व आहे ! याउपरि दिरंग न लावितां सदहू ऐवजाची तरतुद करून ऐवज मुत्वर रवाना करणे. येथील वोढीमुळे परिछिन्न विलंबावरी न घालणे. आतां वाटेनेंहि ठीक आहे. तर ऐवज जलदीने पाठवणे. जाणिजे. छ १३ जिलकाद, सु।। इहिदे सितैन मया व अलफ. + बहुत काय लिहिणे. भदावरचे वाटेनें अगर ग्वालेरवरून सत्वर चांगला ऐवज यावा. लाख पन्नासाने होणे काय ? हे विनंति. जो जमा होईल तो वरचेवर पाठवणे. त्या ( विलंब) लागल्या चाकरीस फार शब्द लागेल. हे विनंति. एकादो महिन्यांत रसदेचाहि भरणा इकडेच करणे. हे विनंति. २९२ भाऊसाहेब हिंदस्थानांतील मामलेदारांकडून रसदेचे पैसे मागवीत हे ह्या वाक्यावरून उघड आहे. गोविंदपंताला पंचवीस लाख रुपये वाकीचे व रसदेचे मिळून द्यावयाचे होते; परतु, ते त्याने शेवटपर्यंत मुळीच दिले नाहीत. हे पन्नास हजार व शेवटी एकदां साडे चार लाख गोविंदपंताने पाठविले; परंतु, त्यापैकी काही गिलच्यांनी मध्येच छुटून नेले. गोविंदपंताच्या प्रांतांत दंगाधोपा दिलकुल नव्हता. असे असून गोविंदपंताने