पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

इतिहासाच्या प्रस्तावनेत स्वतःच प्रांजलपणे व विनयाने कबूल करितो. आपल्या वयाच्या सोळाव्या वर्षी ग्रांटडफ्नै शाळा सोडिली. तोपर्यंत व्याकरणभूगोलादिविद्यासंपत्ति जी काहीं मिळाली ती घेऊन तो हिंदुस्थानांत आला व तेवढ्यावरती आपल्या लष्करी व मुलकी हृद्याला लिहिणें सवरणे त्याच्या वरिष्ठांच्या मताप्रमाणे तरी त्याने मोठ्या बहादरीने केले. पुढे पेशवाई बुडत असतां व बुडाल्यावर पुणे व सातारा येथील अवाढव्य दफ्तरे त्याच्या हातांत आली व त्याला मराठ्यांचा इतिहास लिहिण्याची स्फूर्ति झाली. परंतु, उदार शिक्षणाचा ह्मणजे प्राचीन इतिहासादि विद्यांचा जो काही योग्य संस्कार मनुष्याचे मन उदात्त, कुशाग्र, ग्राहक व मार्मिक करण्यास लहानपणींच लागतो तो ह्या इसमाला झाला नसल्याकारणानें, आत्मिकरीत्या मराठ्यांच्या इतिहासाचे विवेचन करण्याचे तर त्याला सोडून द्यावे लागलेच; परंतु, भौतिक पद्धतीनेंहि जे मराठ्यांच्या इतिहासाचे वर्णन त्याने केले आहे तेही अनेक प्रकारे व्यंग आहे. कालविपर्यासाचा दोष, मोठमोठ्या मोहिमांचे अज्ञान व सापेक्षदृष्ट्या कोणत्या प्रसंगाला किती महत्त्व द्यावें ह्याची नुमज, इतर मराठी बखरींप्रमाणेच ह्याच्याहि इतिहासांत दिसून येते. १७५० पासून १७६१पर्यंत झालेल्या रघुनाथरावाच्या मोहिमांच्या कालाचा ग्रांट डफ्ने कसा विपर्यास केला आहे व त्यामुळे तो कसा कसा गोत्यांत पडत गेला आहे हे मी मागें नुकतेंच दाखवून दिले आहे. त्याने मोहिमा कोणकोणत्या गाळल्या आहेत याचाहि निर्देश मागे झाला आहे व त्या वेळच्या मराठ्यांच्या अवाढव्य प्रयत्नांच्या मानाने त्या वेळच्या इंग्रजांचा प्रयत्न अगदीच क्षुद्र असून त्यांच्या वर्णनाने आपल्या इतिहासाची संकुचित जागा सापेक्ष दृष्टीने ग्रांट डफ्नै किती अडविली आहे, हे सुरत, विजयदुर्ग, बाणकोट इत्यादि ठिकाणी इंग्रजांनी केलेल्या वळवळींचे पवाडे वाचून कोणाच्याहि ध्यानात येण्यासारिखे आहे. ह्या वळवळींसंबंधानें ग्रांटडपचे स्वतःचेंहि मत वर निर्दिष्ट केल्याप्रमाणेच आहे. तो ह्मणतो, इंग्रज महाराष्ट्राचे पुढे धनी झाले ह्मणून ह्यावेळची ही त्याची कृत्ये सविस्तर वर्णिली पाहिजेत. ह्मणजे इंग्रजांच्या हिंदुस्थानांतील इतिहासाच्या महासमुद्रांत शेवटी मराठ्यांच्या इतिहासाचा लोप होणार हे मत दृष्टीपुढे ठेवून त्याने मराठ्यांचा इतिहास लिहिला. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला प्रारंभ झाल्यापासून ह्मणजे इ.स. १६४६ पासून १७९६ पर्यंतच्या १५० वर्षांचा इतिहास त्याने ४७५ पावणे पांचशे पृष्ठांत आटोपून पुढील २२ वर्षांच्या हकीकतीला २०० दोनशे पृष्ठं दिली आहेत. पहिल्या १५० वर्षांतील मराठ्यांच्या खटाटोपी किती अवाढव्य होत्या ह्याचा विचार केला तर पुढील २२ वर्षांना त्याने जितकी पृष्ठे दिली आहेत त्यांच्या मानाने ह्या १५० वर्षांना १२०० पृष्ठे तरी निदान देणे जरूर होते. परंतु, इतकी विस्तृत माहिती दिल्यास ती आपल्या इंग्रजी वाचकांस रुचणार नाही हे ध्यानात धरून त्याने आपल्या इतिहासाची रचना केली ( Duft's preface ). इतिहास लिहिण्यांत त्याचा मुख्य हेत आपल्या देशबांधवांना मराठ्यांच्या संबंधी ठोक