पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/264

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

थोर आहे. प्रयत्न आमचा आहे. तेथे चार रुपये आकारतील ऐसा भरंसा वाटतो. वरकड हिंदुस्थानांत कोठे जीव दिसत नाही. जाटांत जीव आहे, द्रव्यवान आहे, परंतु किले मातबर आहेत व मोठा काबूकार आहे. सारांश मातबर मनसुबा केल्याखेरीज ऐवज भारी दिसत नाही. दत्तबास पाठवावें ह्मणजे अबदालीचे कामास येतील. तो न आला तरी बंगालियाचा कारभारास कामास येतील. येथे दोन महिने जाहाले. माधवसिंग मामलती करीत होता. परंतु मल्हारवा न आइकत. हजारों कजिये माधवसिंगावर काढिले. तो किल्यांत पंधरा वीस हजार फौजेनशीं; आह्मी मल्हारबा बारा चौदा हजारानशीं; बाहेर मल्हारबाची तरी दीडदोन हजार पर्यंत फौज येथे आहे. लटके आपले घराऊ हिशोब काढून मामलत न करीत. आझास बाहेर कर्ज देखील भक्षावयास न मिळे. रोज गांव मारून खावे. सांप्रत या मुलुखांत गढ्या फार बांधल्या आहेत. झुंजल्याखेरीज दाणा नाहीं, रुपया नाहीं, कर्जहि न मिळे. तेव्हां आमी मल्हारबास टाकून मामलती रगडून केली. त्याचे कानावर घालूनच केली. परंतु कष्टी जाहाले. अकरा पैकी सहा लक्ष आले, त्या पैकींहि त्याची वाटणी दोन लक्ष देणे पडली. बाकी चार लक्ष आह्मांस ऐवज आला. सारांश मल्हारवा ज्या ल्या कारभारांत ओढितात. आमी सोशितों. निदानीं येक येक दोन दोन फाके लष्करास जाहाले. तेव्हां येणेंप्रमाणे केले. पुढे त्यास घेऊन जातो. समजावीसहि करूं. परंतु खुलासा लिहिला आहे. दत्तबा आलियाने परस्परें वर्म असते. याजमुळे ओढणार नाही. आपल्यांत दुही पडते. तेव्हां शत्रूस बळ फावतें. ऐसे हजारों पेंच होतात. कोठवर ल्याहावे ? संकलित लिहिले असेत. बहुत काय लिहिणे. रवाना छ २४ सवाल. बहुत काय लिहिणे.हे विज्ञापना. पै॥छ २४ जिलकाद, श्रावणवद्य ११. १६२ छिद्रान्वेषी. १६३ जयनगरकर. जयनगरच्या माधवसिंगाकडून खंडणी घेण्याकरितां दादा ह्यावेळी दिल्लीस मुख्य ठाणे ठेवून गेले होते असे दिसते. १६४ कधी अबदालीच्या व कधी मराठ्यांच्या भयास्तव.