पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/248

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ग्याकडून आलें जे आह्मी छावणीस तुह्मापाशीच येतो, इकडे छावणी करीत नाही. फिरंगीहि येतच आहेत. फिरंगी न आले तन्ही चिंता नाही. आह्मी भोसल्याचे पारपत्य उत्तम प्रकारे करतो. उभयतां निंबाळकराचा मजकूर. त्यासी अबदालीची खबर दाट होती. यास्तव रा॥ जानोजी निंबाळकरास रुखसत करतेवेळेस व रा॥ हणमंतरायाची भेटी जाली तेव्हां सांगितलेच आहे जे पुढे तुह्मांस मातबर फौजेनशी यावे लागेल. त्यांनीहि कबूल केलेच आहे. हे वर्तमान पूर्वीहि लिहिलेच आहे. आतांहि उभयतां निंबाळकरांस फौजेविशी पत्रे पाठविलीत. अशास तुह्मी लिहिल्या॥ फौज त्यांनी आणावी हे तरी कळतच आहे; परंतु त्यांस लिहिले आहे. अलबत पहिलेपेक्षां सवाई दिढी फौजा घेऊन येतील यांत संशय नाही. पहिलेपासूनहि मातबर फौजेनशींच चाकरी करीत आलेत व पुढेहि ते चाकरी चांगलीच करून दाखवितील. कळले पाहिजे. मोठा मनसबा अबदालीचा होता.ते अरिष्ट सांप्रत जगदीशे वारलेच आहे. हे विनंति. रवाना छ १३ रमजान. । विनंति नवाब समसामजंगास श्रीमंत आपले परम मित्र जाणतात. सरकारच्या कुल जानसालाचा जिम्मा त्यांचा आहे यांत संशय नाही ह्मणोन लिहिले. अशास, शाहानवाजखानबहादर हेहि आपणांस श्रीमंताचें नायब असें मानतात. व हरघडी हेच ह्मणतात की श्रीमंताकडून त्या दौलतीत श्रीमंत भाऊसाहेब व या दवलतींत मी श्रीमंताशी अंतर करणार नाही. १४८ अबदाली १७५७ च्या मार्गात दिल्लीस आला. तेथून त्याने मथुरा, आग्रा इत्यादि ठिकाणे घेतली व त्यापुढें बंगाल्यावर व दक्षणेवर स्वारी करण्याचा त्याचा इरादा होता (लेखांक ६३). अबदालीचा हा इरादा जेव्हां पेशव्यास व निजामास कळला तेव्हां दोघांनीहि त्याला प्रतिबंध करण्याचा बेत केला. पुढे उन्हाळा झाल्यामुळे व विशेष जोरहि न राहिल्यामुळे अबदाली विलायतेस निघून गेला; व निजामाला अबदालीवर चालून जाण्याचे श्रेय फुकाचे मिळाले असते तेंहि मिळ.लें नाही. “ अबदालीचे अरिष्ट जगदीशे वारलें," ह्याने निजामाचा आव वांचला. घरच्या निंबाळकरासारख्या सरदारांना आवरतां आवरतां निजामाच्या नाकी नव आले तो अवदालीला कितीसें तोंड देता हे कळतेंच आहे !