पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०४ पूर्ण विश्वास होता. तो किती अस्थानी होता हे पानिपतची लढाई झाल्यानंतर स्पटप कळून आले. विवेचन आठवें. १७५० पासून १७६१ पर्यंतच्या मराठ्यांच्या इतिहासाचा थोडाबहुत उलगडा कर ण्याचा अल्प प्रयत्न मागील सात विवेचनांत केला आहे. त्यावरून असे मत होतें की काव्येतिहाससंग्रह, ऐतिहासिकलेखसंग्रह व प्रस्तुतचा ग्रंथ ह्या तीन पुस्तकांत जो पत्रव्यवहार सांपडला आहे तो अत्यंत त्रोटक आहे. ह्या दहा वर्षांत मराठ्यांचा खटाटोप केवढा अवाढव्य होता हे दाखविण्यास त्याचा उपयोग झाला आहे हे खरे आहे. परंतु, ह्या खटाटोपाचा व त्याच्या निरनिराळ्या अंगांचा सविस्तर, सकारण व विश्वसनीय वृत्तांत देतां येण्यास अद्यापि पुष्कळच आणखी पत्रव्यवहार सांपडला पाहिजे. तो कोठे व कोणापाशों सांपडेल ह्याचा खुलासा खाली करतो. ह्या ग्रंथाच्या शेवटी व्यक्तींच्या नावांचे एक विल्हेवार परिशिष्ट दिले आहे. त्या व्यक्तांच्या राहण्याच्या स्थलांचा शोध काढून त्यांची दफ्तरे तपासली पाहिजेत. इनाम कमिशनच्यावेळी महाराष्ट्रांतील बहुतेक गांवची दफ्तरे इंग्रजसरकाराने तपासली आहेत. त्यांतील सनदा वगैरे कामाचे कागद वगळन बाकीचे सर्व किंवा बहुतेक कागद अद्याप जसेच्या तसेच आहेत ते तपासण्याचे काम त्या त्या प्रांतांतील व गांवांतील शोधक लोकांनी केले पाहिजे. किंवा एखादी इतिहासाच्या साधनांची शोध करणारी मंडळी स्थापण्यांत येऊन तिच्या सभासदांनी हे काम करण्याचे पत्करिले पाहिजे. शोध करणारे गृहस्थ इतिहासज्ञ असल्यावांचून दफ्तरें नीट तपासलों जाणार नाहीत. खुद्द दफ्तरांच्या मालकांना आपल्या दफ्तरांत काय आहे हे माहीत नसण्याचा बहुत संभव असतो. शिवाय कोणी शोधक त्यांच्याकडे शोध करावयास गेल्यास त्याला नकारात्मक उत्तर देण्याची इतिहासाच्या औदासीन्यामुळे त्यांना संवय लागलेली असते. कोठे कोठें इतिहासाचे महत्त्व जाणणारे दफ्तरांचे मालक आढळतात. आपण स्वतः दफ्तर पाहून इतिहासाच्या उपयोगी कागद काढून देऊं ह्मणून त्यांचा आग्रह असतो. परंतु शोधकांनी स्वतःच दफ्तर पहावें हे उत्तम. इतिहासाला उपयोगी कागदपत्र टाकून देण्याचे व निरुपः योगी पत्रं दिसावयाला चांगली दिसतात ह्मणन दाखविण्याचे व्यसन कित्येकांना लागलेलें माझ्या पाहण्यांत आहे. ह्याकरितां होईल तितकें करून शोधकांनी स्वतः रुमाल, कागद व गळाठा तपासावा हे विशेष फायद्याचे आहे. विवेचन नववं. पहिल्या विवेचनांत ग्रांटडफच्या पद्धतीचा किंवा पद्धतीच्या अभावाचा विचार करून मराठ्यांचा इतिहास भौतिक व आत्मिक अशा दोन्ही पद्धतींनी लिहिला असतां सर्वांगांनी संपूण होईल ह्मणून सांगितले आहे. हा सर्वांगांनी संपूर्ण असा इतिहास लिहावयाचा मटला ह्मणजे अगोदर नानातन्हेची तयारी झाली पाहिजे. प्रथम धर्म, नीति, विद्या, समाज, व्यापार, कृषि, कलाकौशल्य, कायदेकानू, राजकारण, मोहिमा वगैरे प्रकरणांसंबंधी अस्सल