पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आकषून घेण्याचीहि साधनें पेशव्यांच्या जवळ नव्हती. कथा, पुराणे, यात्रा वगैरे संस्था सतराव्या शतकांतल्याप्रमाणे अठराव्या शतकांतहि चालू होत्या. परंतु, सतराव्या शतकांतला जिवंतपणा अठराव्या शतकांतील कथा पुराणांत राहिला नव्हता. येणेप्रमाणे मराठ्यांच्या राजकारणाला सरदारांची व प्रजेची मनें उपयोगी पडण्यास योग्य जेणेकरून होतील अशी-ग्रंथ, व्याख्याने वगैरे-साधनसंपत्ति पेशव्यांनों तयार न केल्यामुळे हिंदुस्थानांतील मराठे सरदार व तद्देशीय संस्थानिक व सामान्यजन पानिपतच्या मोहिमेच्या अगोदर व नंतर मराठ्यांच्याविरुद्ध उठले ह्यांत तिळमात्र संशय नाही. ग्रंथसमूहाचा, धर्मव्याख्यानांचा, साधुसंतांचा व यात्राजत्रांचा उपयोग राष्ट्रांतील लोकांच्या मनाला नीट वळण देण्यास केवढा मोठा होतो ही गोष्ट शहाजी व शिवाजी ह्यांच्या मनांत जशी बिंवली होती तशी बाळाजी बाजीरावाच्या व सदाशिव चिमणाजीच्या मनांत भरलेली दिसत नाही. शिवाजी व बाळाजी ह्यांच्यामधील महदंतर हेच होय. राज्ये मिळविण्यास जसा तोफांचा व शिपायांचा उपयोग होतो तसा ती कायम राखण्यास व जतन करण्यास व्याख्यानांचा व विचारी पुरुषांचाहि होतो. । हे तत्त्व पेशव्यांच्या ध्यानांत कां आलें नाही ह्याचे कारण शोधण्यास फारसें लांब जावयास नको. त्या वेळी महाराष्ट्रांत विद्येची व शिक्षणाची स्थिति कशी हाता ह्याचा विचार कला असता ह्या कारणाची अटकळ बांधितां येण्यासारखी आहे. त्या वेळच्या विद्येचे स्थल मानाने तीन भाग करितां येतील:-(१) वैदिक, (२) शास्त्रीय व (३)व्यावहारिक. वादक ब्राह्मण दश ग्रथांचं पठन करीत: षट्शास्त्रांचा जिम्मा शास्त्रीपंडितांनी घेतला होता; व ब्राह्मणवश्यादि इतरजन व्यवहाराला उपयोगी जें ज्ञान ते संपादन करीत. वैदिक व शास्त्रापाडत ह्याना राजाश्रय असे व व्यवहारिक शिक्षणाच्या शाळेतील पंतोजींना लोकाश्रय असे. व्यवहारशिक्षणांत अक्षरांचे कित्त, संसारचोपडी, वरावर्दीगणित, मराठ्यांच्या व मुसुलमानांच्या बखरी व तवारिखा, विक्रमबत्तीशी, वेताळपंचविशी, शुकबहात्तरी, लटकचाळिशी, भारत, भागवत व रामायण ह्या । इतिहासग्रंथांतील " आख्यानांच्या मराठी बखरी, रामरक्षादि स्तोत्रं, जमाखर्चाच्या पद्धति, भमापन, पत्रे लिहिण्याचे मायने, मराठी कविता, वगैरेंचा समावेश होत असे. पुरुषाप्रमाणे अत्यंत कुलीन स्त्रियानांहि लिहितां वाचतां येत असे. व्यवहारशिक्षण बहुतेक सर्व ब्राह्मणांना, वैश्यांना व उच्चप्रतीच्या मराठ्यांना मिळत असे. गृहस्थ, ब्राह्मण व मराठे ह्यांचे धंद्याच्या मानाने तीन वर्ग करितां येतलि:-(१) स्वतःची शेतवाडी पहाणारे, (२) कारकुनीचा धंदा करणारे, (३ ) व शिपायगिराची पेषा स्वीकारणारे. ह्या तिन्ही धंद्यांतील लोकांना वर सांगितलेल्या व्यवहारशिक्षणाच्या पलीकडे माहिती पटली ह्मणजे वयपरत्वे येणाऱ्या जगाच्या अनुभवाखेरीज जास्त कांहीं एक नसे. कारकुनांना व शिपायांना हिंदुस्थानचे भूज्ञान स्वतः हिंडून जे काही मिन्टे त्यापलीकडे बिलकुल नसे. हिंदुस्थानाव्यातिरिक्त इतर देशांचे भूज्ञान ह्या लोकांना कांहींच नसे. निपाणीजवळ भोज येथील कुळकाच्या येथे मला एक अठराव्या शतकांतील पृथ्वीचा नकाशा