शरफोजी यानें निजामशाही सैन्यासह त्या पळणाऱ्या सैन्याची लांडगेतोड
करण्यास सुरवात केली तेव्हां अदिलशाही सरदार जोइरखान यानें
येथें वंजारी कुणबी जातांचा पद्माजी या नांवाचा एक सरपुरुष होता, त्यास
शरण गेला; व त्यास आपली दुःखद कहाणी त्यानें निवेदन केली; त्यावरून
त्या साधु पुरुषानें उदाराम यांस आपल्या सन्निध ठेवून घेतलें, व पुढे त्यांस
"शहरास" जाऊन रोजगार कर, म्हणजे तुझा भाग्योदय होईल असे सांगि
तलें (त्या वेळी त्या भागांत "शहर" हें नांव औरंगाबाद, या शहरास होतें.)
त्याप्रमाणे उदाराम हा औरंगाबाद येथे गेला, व एका अमीराच्या दिवाणाच्या
घरी राहून त्याच्या बरोबर तो दिल्ली येथे गेला; त्या ठिकाणी असतां, एकदां
बादशाहानें त्या अमीरास सांगितलेली कांहीं महत्वाची कामगिरी उदाराम
यानें बजाविली, व ती गोष्ट त्या अमीरानें अकबर बादशाहास निवेदन केली;
त्यावरून बादशाहानें उदाराम यांस आपणासमक्ष बोलावून त्यास उत्तेजन
दिलें; व पुढे वाढवीत वाढवीत त्यास माहूरपासून वाशीमपर्यंत बावन्न
चावड्यांची देशमुखी, पांच हजारांची मनसब, व नौबत निशाण वगैरेची
सनद देऊन, त्याची बादशाहानें दक्षिणेत रवानगी करून दिली.
लष्करी कामांतही उद्धवरावानें फार बहादुरी दाखविली; शहाजहान
याच्या वेळीही उद्धवरावास ( त्यास नंतर " उदाजीराम " असे कागदों-
पत्रों व सर्वत्र नांव पडलें. ) वरील दोन्हीं सरकारांतील देशमुखीवतन व
कांहीं जहागिरी मिळाल्या.
उदारामाची मुख्य कमागिरी जहांगीरच्या कारकीर्दीत घडलेली असून
फारशी ग्रंथांवरून असे दिसतें कीं, लुकजी जाधवरावाप्रमाणेच, उदाराम
हाही प्रथम निजामशाहीत मलिकंबर याच्या हाताखाली प्रसिद्धीस आला; व
इ० सन १६९७ मध्ये मलिकंबरविरुद्ध राजपुत्र खुर्रम (भावी शहाजहान )
यानें जें युद्ध चालविलें, त्यांत तो मलिकंबरचा पक्ष सोडून बादशाही पक्षास
मिळाला; शहाजहानबरोबर तो दिल्ली येथे गेला; व इतर यशस्वी सरदारां-
बरोबर त्याचाही जहांगीरने गौरव करून त्यास अधिकारसंपन्न केलें.
त्यानंतर, भावी काळांत शहाजहान यानें जहांगीरविरुद्ध बंड करून