हकीकतीवरून असे दिसतें कीं, सरफोजी व तुकोजी या उमयतां राज्यक-
त्यांच्या कारकीर्दीत तंजावर येथील मराठथांनीं रामेश्वरच्या आसपासच्या सर्व
प्रदेशभार आपली सत्ता बसविली; आणि तुकोजीच्या कारकीर्दीत, तंजावरकर
मराठषांनी, शिवगंगा व रामनाथ येथील जमीनदारांना इ० सन १७३० च्या
सुमारास जिंकून आपल्या नियंत्रणाखाली आणिलें, तुकोजोच्या कारकीर्दीतही
तंजावरच्या राज्यास सादतउल्लाखान व निजामउलूमुल्क या उभयतांपासून
उपद्रव पोंचण्याची भीति होती. आणि इंग्रज व फेच हे उभयतो कर्नाटकांत
आपला प्रवेश करण्यासाठी योग्य संधि पहात होते; तथापि अशा बिकट
परिस्थितीमध्येही त्याने आपले राज्य सुरक्षित ठेविलें. इतक्यांतच मध्यंतरी
इ. सन १७३२ मध्ये कर्नाटकचा नवाब सादतउल्लाखान हा मृत्यु पावला; व
त्याचा पुतण्या दोस्तभल्ली हा कर्नाटकचा नबाब बनला. त्या वेळी कर्नाटकांत
थोडी चळवळ उत्पन्न होऊन तिचा त्रास तंजावरच्या राज्यास पाँचतो की
काय, अशी भीति उत्पन्न झाली होती; परंतु तुकोजीनें मोठ्या दक्षतेनें व
बंदोबस्तानें राज्यकारभार चालवून आपले संस्थान सुरक्षित ठेविलें.
तुकोजी राजे हा सरफोजीहून अधीक हुषार, राजकारणपटू, व विद्याभि-
लाषी असून त्यास संस्कृत, तामिळ, मराठी व फारशी या भाषा अवगत
होत्या; व त्यामुळे दूरदूरचे विद्वान पंडित व फकीर लोक त्याच्या भेटीस येत
असत, तुकोजीराजे हा इ० सन १७३५ मध्यें, देवगतीस पावला. त्यास
अरणाबाई, रामकुंवरबाई, मोहिनाबाई, मैनाबाई व लक्ष्मीबाई अशा लग्नाच्या
पांच स्त्रिया व अन्नपूर्णाबाई या नांवाची, कट्यारी बरोबर लग्न लाविलेली
(परिगृहीत ) सहावी स्त्रो, मिळून एकंदर सदा स्त्रिया होत्या. त्यांपैकी, लग्नाच्या
स्त्रियांपासून त्यास बाबासाहेब, सयाजी, अण्णासाहेब व नानासाहेब, असे
चार पुत्र झाले व सहावी स्त्री अन्नपूर्णाबाई हिच्यापासून प्रतापसिंह या
नावाचा एक पुत्र ( अथवा दासीपुत्र ) झाला. त्यांपैकी सर्वांत वडील मुलगा
बाबासाहेब हा व्यंकोजी [ ऊर्फ एकोजी ] हे नांव धारण करून तंजावरच्या
गादीचा अघिपति झाला.
व्यंकोजी राजे हा अल्पायु निपजून त्यांची कारकीर्द अवधी एक वर्षातच
समाप्त झाली. हा राजा जात्याच संशयी वृत्तीचा होता, आणि त्यांतच