ह्याच अवधीत मराठघांची जिंजी+ येथील राजकारणे घडून आली आहेत.
शहाजी गादीवर आला, त्याच्या अदल्याच वर्षी ( इ० सन १६८६ मध्ये )
औरंगझेबानें विजापुरचें राज्य बुडविले. व शहाजी गादीवर आला त्याच वर्षी
[ इ० सन १६८७ मध्ये] त्याने गोवळकोंडे येथील राज्य बुडविलें, व
आपला सरदार कासीमखान यांस तिकडे पाठवून सर्व कर्नाटक व दक्षिण
हिंदुस्थान त्याने आपल्या स्वामित्वाखाली आणण्याचा मोठ्या जोरानें प्रयत्न
आरंभिला.
त्यानंतर इ० सन १६९० मध्ये औरंगजेबानें छत्रपति संभाजी याचा
वध केला. त्यावेळी त्याची साध्वी, स्वार्थत्यागी थ आत्मयज्ञपूर्ण अलौकिक
स्त्री येसूबाई, व बालयुवराज शिवाजी ऊर्फ शाहूराजे ही उभयत रायगड
येथील किल्लयावर होतीं. मोंगलांनी सतत दहा महिने हा किल्ला हस्तगत
करून घेण्याची शिकस्त केली; परंतु किल्ला त्यांच्या हाती आला नाहीं. अखे
रीस मोगल सरदार ईतिकदखान याने किल्लयांत फितूरी करण्याचा यत्न चाल-
विला. त्यावेळी सूर्याजी पिसाळ या नांवाचा वाई येथील मराठा देशमूख राय-
गड किल्लयाचा किल्लेदार होता. तो, वाईची देशमुखी औरंगझेबाकडून देववि
ण्याचें, खानाकडून वचन घेऊन, मोंगलास सामील झाला; व त्यानें किल्लयाचे
दरबाजे उघडून शत्रूस आंत घेतले. त्यामुळे किल्ला मोंगलांच्या हस्तगत झाला
.[ इ. सन १६९० च्या अखेरीस ]. आणि येसूबाई व शाहू या उभयतांना
खानानें कैद करून औरंगझेबाकडे नेलें. x संभाजीचा वध झाल्यावर, राय-
गड मोगलांच्या ताब्यांत जाण्यापूर्वी मराठेशाहीच्या सर्व सरदार व मुत्सद्दी
+ जिंजी (Gingee) हा खेडेगांव व किल्ला, दक्षिण अर्काट [कडलूर ]
जिल्ह्यांत, किस्तनागिरी ( Kistnagiri ) पासून समूद्रकिनाण्याकडे जी
सडक जाते, त्या सडकेवर, त्रिवेंद्रमपासून अजमार्से अठरा मैलांवर आहे.
xही सर्व हकीकत पुढील इतिहासांत साद्यंतपणे येणार असल्याने त्रोटक-
रीत्याच तिचा या ठिकाणी उल्लेख केला आहे. रायगड किल्ला मोंगलांच्या हाती
आल्यावर इतिकदखान हा सूर्याजी पिसाळ यांस आपणांबरोबर औरंगझेबाकडे
घेऊन गेला; व त्याची बादशाहाशी भेट करविली. त्या वेळी, बादशहानें “तूं