वरील विवेचनावरून लुकजी जाधवराव याची योग्यता, कर्तृत्वशक्ति, मान-
मरातब व राजकीय महत्त्व केवढे होतें, याची सहज कल्पना होते; व त्यामुळेच
मालोजी व विटूजी भोंसले हे उभयतां बंधू, लुकजीच्या आश्रयास येऊन
राहिले, हैं उघड होतें.
या उभयतां बंधूंपैकीं मालोजी हा शरीरानें अतिशय धिप्पाड व मजबूत
असल्यामुळे त्याच्या स्वारीस चांगला भरभक्कम घोडाही टिकत नसे; म्हणून
निळकंठेश्वराचें देऊळ जाधवरावाच्या काळापेक्षां बरेंच जुनें आहे; त्या-
वरील लेख वाचला जात नाहीं.
शिंदखेड, देऊळगांव व त्या बाजूचा कांहीं प्रदेश अजमायें पन्नास साठ वर्षे
शिंद्याच्या ताब्यांत होता; तो आसईच्या युद्धानंतर निजामच्या ताब्यांत आला;
देऊळगांव राजा येथील बालाजीस त्या गांवासंबंधी सनदा दिलेल्या आहेत.
या शाखेतील अखेरचा प्रसिद्ध पुरुष म्हणजे राजे बाजीराव जाधव हा
असून तो औरंगाबाद येथें रहात असे; व निजामच्या दरबारांत त्याचें अती-
शय वजन असे; आणि निजामाच्या राज्यांतील, व वन्हाडांतील या घराण्याचे
सर्व उत्पन्न बाजीरावाच्या वेळेपर्यंत या घराण्यास मिळत असे. इ. सन
१८५१ मध्ये त्याच्यावर एक मोठेंच संकट आलें, व त्यांत तो सफाई बुडाला.
बाजीरावाच्या हातांखाली, औरंगाबाद येथे आरब लोकांचें लष्कर असे; या
लष्कराची, व इंग्रजी सबसीडियरी ( तैनाती ) सैन्याची लढाई होऊन त्यांत
कांहीं इंग्रज अधिकारी मारले गेले; त्यावरून राजे बाजीराव याचे सर्व वतन
जप्त करून त्यास दौलताबादच्या किल्लयांत प्रतिबंधांत ठेवण्यांत आलें; व पार्ल-
मेंटपर्यंत प्रकरण जाऊन त्याचें सर्व वतन खालसा झालें. राजे बाजीराव याचें
म्हणणें कीं, "वरील आरब शिपाई आपल्या कह्यांत नव्हते; व दंग्यांत आपला
कांहीही संबंध नव्हता; इतकेच नव्हे तर त्यांचा पगार तुंबल्यामुळे ते आप-
णावरच उलटले;" परंतु बाजीरावाच्या ह्या म्हणण्याचा तिळमात्रही उपयोग
झाला नाहीं; तो इ. सन १८५९ मध्ये दौलताबाद येथील किल्लपांत कैदेत
असतांनाच तेथें मृत्यू पावला. जानेफळ, फत्तेखर्डा या गांवच्या व इतर
पाटीलकीची वतनें, व खेर्डा येथील जहागीर ह्या वेळेपर्यंत या जाधव घराण्या-
२