कौशल्य ह्या गोष्टी साध्य असल्या तर कार्थेजियन सैन्याला रोमन लोकांच्या
श्रेष्ठ प्रतीच्या कवायती पायदळ सैन्याशी झगडून आपल्या ताब्यात असलेले
तसेंच ताब्यांत ठेवितां येतें; त्याप्रमाणेच शहाजीनेंडी आपल्या दक्षिणेतील
बांधवांच्या असे निदर्शनास आणून दिले की, हिंदु सेनापतीच्या हाता-
खालील हिंदु सैन्य, स्थानिक माहिती, व सैन्याच्या जलद हालचाली,
यांच्या योगाने दिल्ली अथवा विजापूर येथील निवडक सैन्याबरोबर तोडीस
तोड असा सामना देऊं शकते. शिवाय शहाजीस जर खरोखरीच दिल्ली
व विजापूर या उभयतांपैकी कोणत्याही एकाच सत्तेश झगडावें लागलें
असतें, तर त्यानें बहुघा अहंमदनगरचे राज्य पुन्हां स्थापन केले असतें; व
एखादें कळसूत्री बाहुलें तेथील गादीवर स्थापन करून, आपण त्याच्या नांवानें
राज्यकारभार चालविला असता; परंतु त्यामुळे मराठ्यांना कितपत सौख्य-
लाभ झाला असता, याची शंकाच आहे; कारण ह्या शहाजीच्या राज्यांतहि
निजामशाही राज्याच्या परंपरेप्रमाणेच क्रौर्य, विश्वासघात, आणि खून यांची
परंपरा चालूच राहिली असती; परंतु शहाजीस स्वराज्य संस्थापनेंत जें अप
यश आलें, त्यामुळेच शिवाजीस, एक अगदींच पूर्णपणे नवें, आणि एकंदरीनें
विचार केला तर, ज्या राजकीय गुन्ह्यांमुळे, हिंदुस्थानांतील बहुतेक राज्यांच्या
इतिहासास कलंक लागलेला आहे, व जे इंग्लंड व स्कॉटलंडच्या पूर्वीच्या
राज्यकर्त्यांच्या काळांतहि अनेक वेळां घडलेले आहेत, अशा राजकीय गुन्ह्यां
पासून मुक्त असलेले x असें अपूर्व राज्य स्थापन करितां आलें. " यावरून,
शहाजीची योग्यता, शहाजी व शिवाजी यांच्या कार्याची व्याप्ति, व शिवा-
जीनें स्थापन केलेल्या स्वराज्याचें श्रेष्ठत्व, ह्रीं स्पष्टपणें निदर्शनास येतात.
शहाजीची कर्नाटक प्रांतांतील मांडलिकी राज्याची स्थापना, ही प्रांतिक
स्वरूपाची व मर्यादित व्यासांची होती. परंतु मांडलिकी राज्याच्या ध्येयास
शिवाजीनें गणिस्थान दिले; त्यामुळे त्याची स्वराज्य स्थापना राष्ट्रीय स्वरूपाची
x मराठ्यांच्या इतिहासांत, फक्त एकच राजघुरुषाचा खून झालेला असून
तो म्हणजे नारायणराव पेशवे याचा, त्याचा काका रघुनाथराव यानें केलेला
खून, हा होय.