म्हणजे, याचा अर्थ द्दा उघड होतो कीं, " उत्तरेकडील रजपूतही दक्षिणे-
कडील भोसल्यांना सहानुभूति दाखविण्यास तयार होते, व भोसल्यांना ते
आपले भाईबंद समजत असत; " अर्थात् भोसल्यांचा वंश उदेपूरच्या राज-
घराण्यापैकीच आहे, हीच गोष्ट निर्विवाद खरी आहे, व वरील विवेचनावरून
ती खरी आहे, असेच उघड उघड निदर्शनास येत आहे.
संभाजीचा मुलगा शिवाजी ऊर्फ बाबाजी हा इ० सन १५३३ मध्यें
'जन्मास आला. त्यास मालोजी व विठोजी असे दोन मुलगे होते. यापैकी
मालोजी हा इ० सन १५५० मध्ये, व विठोजी हा इ० सन १५५३ मध्ये
जन्मास आला. हे उभयतां बंधू वर्गांत आल्यावर पहिल्यानें कांहीं
काळ देऊळगांव + येथे आपली शेती सांभाळून तिजवर आपला उदरर्निवाह
+ देऊळगांव, हे ठिकाण व-हाडांत बुलढाणा जिल्ह्यांत बुलढाण्यापासून
आजमासें साठ मैलांवर, चिखली तालुक्यांत आहे. या गांवाचें पूर्वीचे नांव
देवळी हे असून तें पूर्वी अगदीं खेडगांव होतें; तें, पुढे जाधवरावांच्या
घराण्यांतील राखोजी या नांवाच्या दासीपुत्रानें तेथें वस्ती वाढवून
भराभराटीस आणिलें; नंतर तें जाधवांचे राहण्याचे ठिकाण झाले,
व त्यावेळेपासून त्यास " देऊळगांव राजा " असे म्हणूं लागले. राव-
जगदेवराव जाधव यानें येथील बालाजीची स्थापना केली असून भावी काळांत
है देवस्थान फारच महत्त्वास चढले. या बालाजीची स्थापना जरी जाधव-
रावांच्या घराण्यांतून झाली, तरी त्या संस्थानाची खरी वाढ निरनिराळ्या
दुसऱ्याच पुरुषांनी केली; त्यांत हरीसा, रामासा, व नवलसा त्या लाड साव-
कारांच्या तीन पिढ्यांत ती विशेष झाली. हॅ घराणे फार श्रीमंत असून
त्यांच्याकडे संस्थानचा कारभार असतांना त्यांनी सर्व राजेरजवाड्यांकडून ह्या
संस्थानास इनाम जमीनी व वर्षासने मिळविलीं.
हे देवस्थान आसपासच्या भागांत विशेष प्रसिद्ध असून दरवर्षी आश्विन
महिन्यांत या ठिकाणी मोठी यात्रा भरते, व मोठ्या थाटाचा उत्सव होतो;
व देवाचे दुकानांत व्यापारी व इतर लोकांकडून हजारों रुपयांची कानगो
( देणगी ) येते.