नंतर त्याने पहिल्याने विजापूरकरांची मदत मिळावली. यावेळी खवासखान
या नावाचा एक सरदार अदिलशाही राज्याचा वजीर होता; त्याच्याकडे
शहाजीनें मुरारपंतामार्फत बोलणें सुरूं केलें; व त्यास असे कळविलें कीं,
जलें; तेव्हां तो लागलीच सिंहगड येथे परत आला, व याच ठिकाणी त्यानें
आपल्या पित्याचें और्ध्वदोहक कर्म यथासांग करून पुष्कळ दानधर्म केला.
छत्रपति राजाराम महाराज ( शिवाजीचा धाकटा मुलगा व छत्रपति
संभाजीचा धाकटा भाऊ) जालना शहर लुटीत असतां त्याच्यावर एकदम
मोंगल सैन्य चाल करून आलें; त्यामुळे घाईघाईनें परत येत असतां राजा-
रामास प्रवासांत अतीशय त्रास होऊन नवज्वर झाला व तो सिंहगड येथे
आला; तोच इ. सन १७० • फेब्रुवारीत छातीत विकार होऊन त्यास रक्ताच्या
उलट्या होऊं लागल्या; ताप येऊं लागला व लवकरच ( इ. सन १७००
मार्च ) हा मराठ्यांचा तिसरा छत्रपति एकाएकीं याच सिंहगडावर मृत्यू पावला.
शिवाजीचा नित्यपुजेचा बाण राजाराम जवळ ठेवून पूजित असे. त्याची
स्थापना सिंहगडी करून, व राजारामाची तेथेंच छत्री बांधून, रामचंद्र निल-
कंठ अमात्य हुकमत पन्छा ( हुकूम चालविणारा ) यानें त्याच्या व छत्रीच्या
पूजानैवेद्याचा व पुण्यतिथीचा खर्च चालण्यास गांव व सरंजाम नेमून दिला.
त्याप्रमाणे वहिवाट चालत आहे.
शिवाजीचा प्रसिद्ध स्नेही तानाजी मालुसरे व मोंगल सरदार शूर रजपूत
राठोड सरदार उदेभान हे उभयतां याच ठिकाणी लहून मृत्यू पावले ( इ०
सन १७७०. फेब्रुवारी ). त्यांची थडगी एकमेकांपासून सुमारे दीडशें
याडांच्या अंतरावर किल्लयाच्या वायव्य कॉपन्यांत आहेत; त्यापैकीं उदे-
भानाचे थडगे हैं पिराचें स्थान मानितात.
ह्या किल्लयांत एक हजार मनुष्य राहण्यासारखी जागा असून आंत
पाण्याची लहान मोठी दहा बारा टार्की आहेत; व त्यांचे पाणी स्वच्छ व
थंडगार असून फार गोड आहे. किल्लयांत एक धर्मशाळा असून तेथें पाहिजे
त्यास रहावयास जागा मिळते. हा किल्ला अद्यापि फार चांगल्या स्थितींत
आहे.