महालदारखान हा होय; निजामशाही राज्यावर मोंगलांनी चढाई केल्या-
बरोबर महालदारखान हा अतीशय घाबरला व तो मोहबतखानास शरण गेला;
आणि " मला बादशाही नौकरींत दाखल करा; म्हणून स्यानें मोहबत
खानास विनंती केली. त्या वेळी खानाने त्यास सांगितले कीं, शहाजीचें कुटुंब
जिजाबाई व मुलगा शिवाजी ह्रीं उभयतां हल्लीं बायझापूर येथे रहात आहेत;
त्यांना तूं जर पकडून आणून आमच्या स्वाधीन करशील तर, तुझ्या इमानी-
पणाबद्दल बादशहाची खात्रो होऊन तो तुला आपल्या नोकरीत दाखल करील.
ही अट त्या किल्लेदारास मान्य झाली; त्यानें जिजाबाई व शिवाजी या उभय
तांना पकडण्याचे प्रयत्न सुरू केले; आणि युक्तिप्रयुक्तीनें त्यांना पकडून
मोहबतखानाच्या छावणीत आणिलें. यावेळीं लखूजीचा भाऊ जगदेवराव
जाधव-जो मोंगलांतर्फे शहाजीबरोबर युद्ध करीत होता तो शहाजीचा चुलत
सासरा जगदेवराव जाधव-हाही तेथेंच होता. त्यास ही हकीकत कळल्या-
बरोबर तो खानास जाऊन भेटला. "शहाजीचें व आमच्या घराण्याचे वांकडे
आहे; त्यामुळे त्यानें जिजाबाईस व तिच्या मुलास टाकून दिलेले आहे; शहा-
जीचें व जिजाबाईचें पटत नाही म्हणून त्यानें मोहित्यांची कन्या तुकाबाई
हिजबरोबर दुसरा विवाह केला आहे. म्हणून जिजाबाईस व तिच्या मुलास
पकडल्यानें शहाजीस वाईट वाटण्याच्या ऐवजी उलट आनंदच होईल; परंतु
त्यामुळे आमचा अतीशय कमीपणा होऊन आमच्या घराण्याची मात्र अब्रू
जाईल; " अर्से खानास सांगून, त्या उभयतांना सोडून देण्याबद्दल त्याच्या
जवळ रदबदली केली, खानासही जगदेवरावाचें हे म्हणणें खरें वाटलें, व
त्यानें त्या उभयतांना जगदेवरावाच्या स्वाधीन केलें ( इ. सन १६३४ ).
तेव्हां त्याने त्यांना शहाजीच्या ताब्यांतील कोंडणाX किल्लघावर लागलीच
अजमार्से वीस मैलांवर असून, तेथून त्रिकपर्यंत पक्कथा सडकेचा रस्ता आहे.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी “श्री त्रिंबकेश्वर" हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग ह्या ठिकाण
आहे, व येथून जवळच असलेल्या ब्रह्मगिरीच्या डोंगरावर गोदावरी नदीचा
उगम असून त्यास " गंगाद्वार " अथवा " गोदाद्वार " असे नांव आहे.
X कोंडणा, कोंडाणे अथवा सिंहगड हा किल्ला पुणे जिल्ह्यांत हवेली तालु..