Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सरदार गंगाधरराव रघुनाथराव गंभीरराव देशमूख,
देशपांडे, सरकानगो, सावदें जिल्हा पूर्व खानदेश.

 श्रीमंत गंगाधरराव रघुनाथराव गंभीरराव, सरकानगो, देशमूख, देशपांडे, व सेकंडक्लास सरदार, सावदें, जिल्हा पूर्व खानदेश, आणि नेमाड, हे, जे घराणें • सहारों पन्नास वर्षा पूर्वी, अर्जुन नाईक या नावाच्या एका मनुष्याचा मुलगा नाम गुरूदास याने स्थापन केलें, त्या घराण्याचे वंशज आहेत. गुरूदास हा बादशहा मुबारिक याच्या अतीशय मेहेरबानींतील असून बादशाहानें त्यास खानदेश आणि नेमाड प्रांतांतील आशिरगड, सावदें, मांजरोद, वरणगांव, आणि डांगरी परगण्यांची, देशमुखी आणि देशपांडेपणाचे, वतन बहाल केले होते. त्याच्या मृत्यू नंतर त्याचा मुलगा गंगोजी हा त्या वतनाचा मालक झाला; त्यानें भिल आणि पेंढारी यांच्या मध्यें सलोख घडवून आणण्यात प्रमुखत्वाने भाग घेतला, आणि बादशाही सैन्यास सामुग्री वगैरेंचा पुरवठा केला. या त्याच्या कामगिरी बद्दल बादशहा अल्लाउद्दीन यार्ने त्यास खानदेशांतील एकशे तेवीस गांवची जमेदारी, सरकानगोपणा, “ गंभीरराव " हा किताब व सरदारकीचे सर्व मानमरातब, हीं सर्व त्यास वंशपरंपरेने बहाल केली. त्यानंतर हल्लींच्या सरदार साहेबाचे आजे केशवराव गंभीरराव यांनी आपल्या प्रदेशाच्या हद्दींत "सर्व्हे सेटलमेंट " म्हणजे जमीनीची मोजणी व धाराबंदी चा उपक्रम करण्यांत इंग्रज सरकाराला प्रत्येक प्रकारची मदत केली, आणि नवीन सुधारणा सुरू करण्याच्या, व पूर्वीच्या कांहीं बाबतीं दुरस्त करण्याच्या काम ही साह्य केले; ह्या गोष्टी लक्षांत घेऊन या घराण्यातील इल्लीचे मुख्य पुरुष श्रीमंत गंगाधरराव यांस हिंदुस्थान सरकाराने इ० सन १९०९ मध्ये सरदारकीचा मान अर्पण केला. हिंदुस्थान सरकारानें पूर्व खानदेश जिल्हयास "सरदार" ही पदवी अर्पण केल्याचें हें पहिलेच उदाहरण आहे.
 सरदार गंगाधरराव देशमूख, हे, कांहीं काळ, डिस्ट्रिक्ट लोकल बोर्डाचे मेंबर, व सावदे म्युनसिपालिटीचे प्रेसिडेंट असून सावर्दे गावाची सर्व साधारण सुधारणा, आणि आरोग्य, या बाबतींत त्यांनीं मौल्यवान कामगिरी बजाविली आहे व ती सरकारास ही मान्य झालेली आहे. त्याप्रमाणेच त्यांना दुसऱ्या 'बर्गाच्या मॅजिष्ट्रेटचे अधिकार देऊन सरकारानें त्यांचा बहुमान केलेला आहे. शिवाय सर्व सावदे परगण्याच्या धर्माधिकारीपणाचा अधिकारही त्यांच्याचकडे असून संकेश्वर आणि करवीर मठाच्या शंकराचार्यानी त्यांनां नुकताच " धैर्योदार्थ चुडामणी " हा किताब देऊन त्यांचा गौरव केलेला आहे.