एका मनुष्यास इजितमध्यें खलीफा बनवून इजितच्या सुलतानासाठी त्याचा
आशिर्वाद मिळविला. नंतर इ. सन १५२० पर्यंत खलीफा व खिलाफत हीं
इजिप्तमध्ये कायम होती, परंतु त्या वर्षी तुर्कस्थानचा आटोमन वंशांतील सुल..
तान सेलीम यानें इजितचा सुलतान कुनशुलधरी याच्यावर स्वारी करून त्याचा
पराभव केला; तेव्हां खलीफा, सेलीमच्या पचास मिळाला. व त्याच्या बरोबर
कान्स्टॉटिनोपल येथे गेला. नंतर खलीफा अलमुसा यानें आपले सर्व अधिकार
तुर्की मुलतान उस्मान अल्ली याच्या स्वाधीन केले, व आपण इजिप्तमध्यें परतः
निघून गेला. म्हणजे आटोमन राजघराण्यांतील खलीफांचे अधिकार दुरंगी-
म्हणजे राजकीय व धार्मिक गुरुत्वाचे असे दुहेरी आहेत. शिवाय जरी काहीं
काळ काहीं खलीफा इजिप्तमध्यें राहिले असले तरीही महंमदी पवित्र भूमीवर
त्यांचाच हक असून इजिप्तचे मुलतान खलीफांच्या तर्फे त्यांचे रक्षण करीत
असत; पुढे या पवित्र भूमी वरील इजिप्तचा ताबा नाहींसा होऊन, खलीफा पदा-
बरोबरच तोही आटोमन सुलतानाकडे गेला, व त्या वेळेपासून आज तागायत ते
त्यांचें सरक्षण करीत आले आहेत. " उलटपक्षों मराठ्यांच्या इतिहासात राज--
कीय व धार्मिक अधिकार निरनिराळ्याच व्यक्तिच्या हातांत राहिलेले आहेत;
आणि हेच वैशिष्य अतीशय महत्वाचें व लक्षांत ठेवण्या सारखे आहे.
हिंदुस्थानांत मोंगल साम्राज्य अस्तित्वात होतें, त्या काळापूर्वी, व त्या
काळांतही, अनेक मुसलमानी राज्ये विद्यमान होतीं; आणि विजयानगरकर
रामरायाचा तालीकोट जवळील युद्धांत नाश होऊन तें राज्य नामशेष झाल्या
वेळेपासून मराठ्यांचे राज्य निर्माण होईपर्यंत दक्षिणेंत पहिल्याने बहामनी
राज्य, व नंतर त्याच्या शाखा, व उत्तरेस मोगल साम्राज्य, सत्तापूर्ण होतें.
या सर्व राज्यांत मोठमोठ्या अधिकाराच्या जागा मुसलमानांनाच मिळत
असत; तरी सुद्धां अशा बहुतेक सर्व अधिकाऱ्याजवळ हुषार हिंदू गृहस्थ
कामास नेमिलेले असत; दिवाणी, चिटणीशी, हिशोबी, वकीली वगैरे कामावर
हिंदुच्या नेमणुका होत असत, व ते विशेष विश्वासांतील असून त्यांचा त्या
अधिका-यांना अतीशय उपयोग होत असे. मुसलमानी अमदानींत अशीं
अनेक हिंदू कुटुंबें, दक्षिणेंत व उत्तरेकडे मुसलमान सरदारांजवळ पिठ्या--
नुपिढ्या कार्मे करून प्रसिद्धीस पावलेली होती. अवरंग सेवाच्या मृत्यू नंतरही